बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील दिली.
बारामती- मूठभर लोकांच्या चुकीसाठी सहकार क्षेत्राला बदनाम करू नका. राज्यातील डबाघाईत गेलेल्या जिल्हा बँकांची स्थिती सुधारली आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील दिली.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भिमा कारखान्याच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, सहकार विभाग हा साखर कारखाने चालवित आहे. त्यावर नेमणूक करून दिलेले संचालक मंडळ साखर कारखाने चालवितात. त्या संचालक मंडळाने कारखान्यात आर्थिक गोंधळ करतात. त्याचे खापर सहकार विभागाच्या डोक्यावर फोडता कामा नये. बंद पडलेल्या साखर कारखान्यांची विक्री ही साखर विभागाने केली नाही. कारखाना चालवण्यासाठी भांडवल घेतलेल्या जिल्हा बँक व इतर बँकांचे कर्ज परत फेड न झाल्याने या बँकांनी कर्ज वसुलीसाठी लिलाव करून साखर कारखाने विक्री केली आहे.
या संदर्भात काही शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री तसेच आपली भेट घेतली. या कारखाना विक्रीमध्येचुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला असल्यास चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून वस्तुस्थिती जनतेपुढे आणली जाईल. दोषींवर कारवाई करणार असल्याचे सहकारमंत्री यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक जवळपास ११०० कोटी रुपये तोटय़ात होती. त्यावर प्रशासन नेमल्यावर ती ७५० कोटी रुपये नफ्यात आली. सहकारावर विश्वास ठेवल्यामुळे ३१ मार्च २०१३ अखेर सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.