तेलंगणमधल्या २०० गावांचा सीमांध्रमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख के.चंद्गशेखर राव यांनी गुरुवारी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/07/telgana.jpg)
हैदराबाद – तेलंगणमधल्या २०० गावांचा सीमांध्रमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख के.चंद्गशेखर राव यांनी गुरुवारी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या बंदमुळे तेलंगणमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तेलंगणधल्या २०० गावांना पोलावरम सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने त्यांचा सीमांध्रमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णया विरोधात टीआरएसने एक दिवसाचा बंद पुकारला आहे.
हैदराबादसह १० जिल्ह्यांमध्ये सरकारी परिवहन सेवा बंद असून, तेलंगणमधल्या अनेक भागात दुकाने, हॉटेल आणि व्यावसायिक अस्थापने बंद आहेत. गुरुवारी सकाळीच टीआरएस कार्यकर्ते बस डेपोबाहेर आंदोलनाला बसले आणि सरकारी परिवहन सेवा ठप्पा पाडली. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारचा अध्यादेश असंवैधानिक असून, दोन राज्यांशी चर्चा केल्याशिवाय केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही असे तेलंगणचे भावी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. दोन जूनला तेलंगण राज्य अस्तित्वात येणार आहे.