विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सोमवारी सकाळी सुरूवात झाली.
कोलकाता- विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सोमवारी सकाळी सुरूवात झाली.दोन्ही राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चांगले मतदान झाल्याने आजही मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
सकाळी अकरा वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ३९.६९ टक्के मतदान झाले तर आसाममध्ये ३६ टक्के मतदान झाले होते. राज्य सरकारने सर्व मतदान केंद्रांवर आणि संवेदनशील भागांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. बांगलादेश आणि भूतानच्या सीमेवरही कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
आसामच्या एकूण १२६ जागांपैकी उरलेल्या ६१ जागांसाठी मतदान होत आहे. आसाममध्ये दुस-या टप्प्यात ५२५ उमेदवार रिंगणात आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर, बांकुरा, वर्धमान या जिल्ह्यासह एकूण ३१ जागांसाठी मतदान होत आहे.