नव्या संशोधनपर लेखनासाठी नवीन साधने संकलित होणे गरजेचे आहे. सध्या विविध अभ्यासक गेल्या १०० वर्षात संशोधित करण्यात आलेले संदर्भग्रंथ यावरच अवलंबून आहेत. पण या संकलित साहित्याचा आणि सध्याच्या भूगोलाचा मेळ मांडणेही तितकेच गरजेचे आहे.
महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार आणि इतिहासाच्या साधनांची विपुलता लक्षात घेता येणा-या कालखंडात इतिहास संशोधनासाठी प्रदीर्घ संकलनाची गरज आहे. गेल्या १०० वर्षाच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील अनेक अभ्यासकांनी आणि संशोधकांनी अत्यंत परिणामपूर्वक आणि चिकाटीने साधने संकलित करून आणि संशोधित करून आपल्यापुढे ठेवलेली आहेत.
बदलत्या काळाच्या गरजा आणि ऐतिहासिक स्थळांवर मानवी आक्रमणाचा प्रभाव पाहता ग्रामनामे नद्या, भूगोल, पठारे, डोंगरवाटा इत्यादींचे लिखित संकलन करणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. विशेषत: नव्या संशोधनपर लेखनासाठी नवीन साधने संकलित होणे गरजेचे आहे. सध्या विविध अभ्यासक गेल्या १०० वर्षात संशोधित करण्यात आलेले संदर्भ ग्रंथ यावरच अवलंबून आहेत. पण या संकलित साहित्याचा आणि सध्याच्या भूगोलाचा मेळ मांडणेही तितकेच गरजेचे आहे.
इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे बदलत्या भूगोलाचे मोठे पडसाद. कागदपत्रात आढळणारी ग्रामे व वाटा गेल्या काही वर्षात फारच झपाटयाने बदलून गेलेली आहेत. त्यातही ऐतिहासिक वीरगळी समाधीस्थाने कोणत्याही लिखित पुराव्याअभावी अजूनही बोलकी झालेली नाहीत. युद्धप्रसंगी घडलेली अनेक स्थळे आज खासगी इमारती, घरे यांनी गजबजलेली आहेत आणि काही ठिकाणी भुईसपाट करण्यात आलेली आहेत.
मुळात भूगोल बदलणारच हे वेगळे सांगण्याची गरज नाही, परंतु त्याचे बदलते स्वरूप नोंदवणे काळाची गरज आहे. आज पुरातत्वीय दृष्टिकोनातून फारच मोजकीच मंदिरे, वाडे, मूर्ती संवर्धन केल्या जातात. बराचशा पुरातत्वीय वास्तूंच्या जतनीकरणानंतर अथवा नूतनीकरणानंतर त्यांचे झालेले बदल लिखितपणे नोंदवले जात नाहीत, तसेच त्यांची जुनी-नवी मोजमापे, आराखडे प्रकाशित न केल्याने मूळ इतिहास क्रमश: लोप पावतो.
बदलत्या विज्ञानाने खरं तर अनेक नवी तंत्रज्ञान पद्धती आणि बांधकाम सुलभता आपणास उपलब्ध करून दिलेली आहे, पण त्यांची नियोजन दिशा नसल्याने आजही आपण पुरेसे यश मिळवू शकत नाही. ऐतिहासिक स्थळांच्या उत्खनांतून मिळणारे ठरावीक अवशेष जपून इतर लहान अवशेष सहजपणे दुर्लक्षित केले जातात, परिणामी एखादा महत्त्वाचा धागा सहजपणे नाहीसा होतो. विविध सेवाभावी आणि सामाजिक संस्था प्रेमापोटी आणि काळजीपोटी ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करतात, पण त्यांनी केलेल्या कामाचे स्वरूप आणि बदल यावर कोणत्याही प्रकारची लिखित टिपणे तयार होत नाहीत, हे दुर्दैव्य म्हणावे लागेल.
मुळात सर्वेक्षण आणि संकलन याची टिपणे व नोंदी येणा-या पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील हा विचारच कोणी करत नाहीत. परिणामी आपण पुनष्टद्धr(155) जुन्या व परकीय कागदपत्रांवर विसंबून सोयीच्या अपूर्ण नोंदी प्रकाशित करतो. येणा-या कालखंडात बदलत्या भूगोलाची स्थिती, स्थानिक परिभाषेतील जुनी-नवी ग्रामनामे, मोडीपत्रांतील ग्रामसीमा, नव्या तालुक्यांची निर्मिती, नव्या घाटवाटा आणि रस्ते इत्यादी गणितांचे लिखित संकलन काळाची गरज आहे.
यात स्थानिक ग्रामस्थ आणि गॅझेटिअर प्रतिनिधी यांच्या सक्रिय सहभागाने नवी दिशा मिळेल. उपलब्ध साहित्य विश्वाचे क्रमश: प्रकाशन करून इतिहासाचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्यच मानले पाहिजे.