काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्याच ठिकाणाहूनच पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे.
छत्तीसगड – गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी दर्भा गती खो-यात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर हल्ला केला होता. आता याच ठिकाणाहून पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्याचा निर्धार छत्तीसगड काँग्रेसने व्यक्त केला आहे.
आम्ही याच ठिकाणाहून पुन्हा एकदा परिवर्तन यात्रा काढण्याचे ठरविले आहे. यात्रेची तारीख पक्षश्रेष्ठी घेतील असा निर्धार छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के.हरिप्रसाद यांनी व्यक्त केला.
नक्षलवाद्यांनी २५ मे रोजी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला होता.त्यात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांच्यासहित २७ जणांचा मृत्यू झाला. तर व्ही.सी.शुक्ला यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या सहा जूनला काँग्रेसच्या सर्व जिल्हास्तरीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. तर सात जूनला सर्व जिल्हास्तरीय मुख्यालय बंद ठेवण्यासाठी बैठक होणार आहे.
[EPSB]
काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवादी हल्ला
छत्तीसगडमधील कॉँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर शनिवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांचा मृत्यू झाला.
[/EPSB]