राज्य विधिमंडळाचे साधारणपणे दोनच आठवड्यांच्या कालावधीपुरते चालणारे पावसाळी अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे.
मुंबई – राज्य विधिमंडळाचे साधारणपणे दोनच आठवड्यांच्या कालावधीपुरते चालणारे पावसाळी अधिवेशन यंदा तीन आठवडे चालणार आहे.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा सदर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, विधिमंडळ कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेते या वेळी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, १५ जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत यंदाचे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. यंदा एकूण आठ शासकीय विधेयके चच्रेसाठी सादर होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. सहकार सुधारणा विधेयकासोबतच गेली कित्येक दिवस रखडलेले जादूटोणाविरोधी विधेयक या अधिवेशनात आवर्जून आणले जाणार असल्याचा दावाही पाटील यांनी या वेळी केला. सहकार सुधारणा विधेयक सध्या विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीच्या विचाराधीन आहे.