संसदेचे पावसाळी अधिवेशन पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात अन्न सुरक्षा विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी देण्याबरोबरच भूसंपादन व विमा विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीचे अध्यक्ष व संरक्षणमंत्री ए. के. अॅँटनी यांनी दिली. हे अधिवेशन ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेश २६ दिवस चालणार आहे. सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या १५ तारखेनंतर या अधिवेशनास सुरुवात होते. या अधिवेशनात अन्न सुरक्षा विधेयकासारख्या विधेयकावर चर्चा होण्याची महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच या संदर्भात अध्यादेश काढला होता. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. त्यामुळे संसदेत विरोधी पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान विरोधक कोळसा घोटाळ्यावरुन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची शक्यता आहे.