मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी बुधवारी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
लाहोर – मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी बुधवारी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयात येत्या दोन जुलैला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
न्यायालयाचे न्यायमूर्ती अत्तिर रेहमान हे न्यायालयात हजर होते. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी १८ जून रोजी न्यायालयात याप्रकरणी शेवटची सुनावणी झाली होती.
नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. या प्रकरणीभारताने सबळ पुरावे सादर केल्यानंतर २००९ मध्ये लखवी, अब्दुल वाजीद, मझहर इक्बाल, सादीक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युनूस अंजूम याना कारस्थान रचणे, आर्थिक मदत करणे आणि हल्ला घडवून आणणे या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व आरोपी रावळपिंडीमधील आदियाला तुरुंगात आहेत. पाकिस्तानी न्यायालयात हा खटला अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.