भारताने पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये पुढल्या महिन्यात होणा-या राष्ट्रकुल संसदीय केंद्रीय परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली – भारताने पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये पुढल्या महिन्यात होणा-या राष्ट्रकुल संसदीय केंद्रीय परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने या परिषदेसाठी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवलेले नाही.
त्यामुळे भारताने आक्रमक भूमिक घेत या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षाची शुक्रवारी बैठक झाली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवले नाही तर, पाकिस्तानात होणा-या राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवगळता सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांना या परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. ३० सप्टेंबर ते आठ ऑक्टोंबर दरम्यान इस्लामाबादमध्ये ही परिषद होणार आहे.