पाकिस्तानकडून भारतातील एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल कौतुक करणे ही तशी दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट होय. पण…
इस्लामाबाद– पाकिस्तानकडून भारतातील एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल कौतुक करणे ही तशी दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट होय. पण देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पाकिस्तानमधील एका राजकीय पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.
भारतातील निवडणूक आयोग हा राजकारण आणि लष्करापासून स्वतंत्र आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचीही अशीच रचना हवी असे, मत जमाते-ए-इस्लामी या पक्षाचे प्रमुख सिराज उल हक यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी देशात झालेल्या गेल्यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अफरातफर झाल्याचे आरोप केला होता. यासंदर्भात एका चर्चासत्रामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले.
इम्रान खान यांनी २९ मे रोजी एका रॅलीमध्ये देशात मुक्त आणि स्वतंत्रपणे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.