पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहेत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील २५ चौक्यांवर आणि १९ गावांवर गोळीबार केला.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/01/Border-Security-Force.jpg)
जम्मू – पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहेत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील २५ चौक्यांवर आणि १९ गावांवर गोळीबार केला.
पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून अरनिया आणि आर.एस.पुरा सेक्टर भागातील २५ भारतीय चौक्या आणि सीमेलगतच्या १९ गावांवर जोरदार गोळीबार सुरु केल्याची माहिती बीएसएफ अधिका-याने दिली. पाकिस्तानच्या या गोळीबारास भारतीय सैन्यानेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सकाळी साडेसात वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. या गोळीबारात कोणीही ठार अथवा जखमी झाले नाही. मात्र त्रेवा सीमेवरील गावातील तीन गाई या गोळीबारात ठार झाल्या, असे उपविभागीय पोलिस अधिकारी देवेंदर सिंग म्हणाले.
गेल्या पंधरा दिवसात पाकिस्तानकडून १८ वेळा तर ऑगस्ट महिन्यात वीस वेळा करण्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. याआधी शनिवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सीमा सुरक्षा दलांच्या २२ चौक्यांवर आणि १३ गावांवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन नागरिक ठार झाले असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह सहा जण जखमी झाले.