सीमेवरील गोळीबार रोखण्यासाठी महासंचालक पातळीवर झालेल्या चर्चेचा पाकिस्तानवर काहीही परिणाम झालेला नाही.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/08/encounter1.jpg)
जम्मू – सीमेवरील गोळीबार रोखण्यासाठी महासंचालक पातळीवर झालेल्या चर्चेचा पाकिस्तानवर काहीही परिणाम झालेला नाही.
मंगळवारी पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील पूँछ जिल्ह्यातील दोन सेक्टरमध्ये दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.
भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी रेंजर्सनी क्रिष्णाघाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर स्वयंचलित शस्त्रास्त्रांमधून गोळीबार करत, उखळी तोफांचा मारा केला अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली.
बालाकोटे सेक्टरमध्येही पाकिस्तानने गोळीबार केला. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्याने दिली.
सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत पाकिस्तानने १७ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे. रविवारी राजौरी जिल्ह्यात मांजाकोटमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सोहन हा सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी शहीद झाला होता.