नेरळमध्ये हिंदू-मुस्लीम धर्मियांत निर्माण झालेला तणाव हा पोलिस प्रशासनाची अकार्यक्षमता आणि अविश्वासामुळे निर्माण झाल्याचा आरोप अनेक प्रतिष्ठितांनी शांतता कमिटीच्या सभेत खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर केला.
नेरळ – नेरळमध्ये हिंदू-मुस्लीम धर्मियांत निर्माण झालेला तणाव हा पोलिस प्रशासनाची अकार्यक्षमता आणि अविश्वासामुळे निर्माण झाल्याचा आरोप अनेक प्रतिष्ठितांनी शांतता कमिटीच्या सभेत खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर केला.
येथील बापुराव धारप सभागृहात गुरुवारी शांतता कमिटी सभेचे आयोजन करण्यात आले होते. २५ सप्टेंबरपासून अटकेत असलेल्या तरुणांना जामीन नाकारल्याने त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या सभेत उमटल्या. या वेळी कामगार नेते विजय मिरकुटे यांनी, इराणी लोकांमुळे नेरळचे नाव बदनाम होत असल्याने त्यांना पिटाळून लावण्याची मागणी केली. जयेद नजे यांनीदेखील इराणी लोकांच्या बायका पुढे येतात, असे सांगितले. सावळाराम जाधव यांनी, दामतमधील तरुण किरकोळ भांडण झाल्यानंतर १००-२००चा मॉब गोळा करतात. यावर आक्षेप घेऊन भांडण झाल्यास पोलिस ठाण्यात जा. पण वातावरण बिघडू देऊ नका, असे आवाहन केले. तर माजी सरपंच असगर खोत यांनी २-४ जणांमुळे हा तणाव निर्माण झाल्याचे सांगतानाच, सर्वाना दोष देऊ नका, तसेच अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे कलम कसे बदलले, पोलिस विश्वासघात करत असल्याने भांडणे मिटवण्याची कामे आम्ही कशी करायची, असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, जिल्हा पोलिस अकुंश शिंदे यांनी आपण तणाव संपुष्टात आणण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले. आरोपींवर नंतर वेगळी कलमे लावली असतील तर तुम्ही वकिलांमार्फत हे कलम रद्द करण्याची मागणी करा, पोलिस त्यावर हरकत घेणार नाहीत, असे सांगितले. या सभेत अटक झालेल्यांना गणेशोत्सव संपण्यापूर्वी सोडण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिका-यांनी केली.
१० आरोपींना जामीन
गणेशोत्सव काळात नेरळमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी ज्या १७ आरोपींना विविध तीन गुन्ह्यांत अटक केली होती, त्या सर्वाना २६ सप्टेंबरला कर्जत दिवाणी न्यायालयात हजर केले होते. यातील १७ पैकी १० जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
[EPSB]
नेरळमधील तणाव निवळला
दोन गटांत झालेल्या हाणामारीवरून नेरळमध्ये ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला तणाव निवळला आहे.
[/EPSB]