लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करत असल्याचा आरोप आझम खान यांनी केला आहे.
नवी दिल्ली – वादग्रस्त विधाने करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला मदत करत असल्याचा आरोप आझम खान यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्याआधी जर एखादा व्यक्ती स्वत:ला पंतप्रधान म्हणवून घेत असेल तर ते संविधानाचा भंग केल्यासारखे आहे. आयोग भाजपच्या इशा-यावर चालत आहे. त्यामुळे ही निवडणूक असंवैधानिक घोषित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने मोदींच्या वाराणसीतील प्रचासभांवर बंदी घातली होती. त्यामुळे वाराणसीत भाजप नेत्यांनी आयोगाविरोधात बनारस हिंदू विद्यापीठासमोर आंदोलन केले होते.