बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्याच्या मतदानापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारच्या मतदारांना नितीश कुमार यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्याच्या मतदानापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारच्या मतदारांना नितीश कुमार यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
मी बिहारच्या बंधु, भगिनींना नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करतो असे टि्वट केजरीवालांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नितीश कुमारांना पाठिंबा दिला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बिहारच्या जनतेला नितीश कुमारांना मतदान करण्याची विनंती केली होती. देशाची सध्याची गरज आणि राज्याच्या विकासासाठी तुम्ही नितीश कुमारांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन ममतांनी केले होते. बिहार निवडणूकीत नितीश कुमार धर्मनिरपेक्ष आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा या आघाडीत समावेश आहे.