वसई-विरार महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कत्तलखान्याला शिवसेनेने कडवा विरोध केला आहे. तर हा विरोध अज्ञानातून झाल्याचा आरोप करत हिंदू खाटिक संघटनेने कत्तलखाना झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
वसई- वसई-विरार महापालिकेने प्रस्तावित केलेल्या कत्तलखान्याला शिवसेनेने कडवा विरोध केला आहे. तर हा विरोध अज्ञानातून झाल्याचा आरोप करत हिंदू खाटिक संघटनेने कत्तलखाना झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालिकेचा कत्तलखाना वादाच्या भोव-यात सापडला आहे.
नालासोपा-यातील सव्र्हे क्रमांक ३२ ‘अ’ या जागेवर महापालिकेद्वारे कत्तलखाना उभारण्यात येणार आहे. मात्र या कत्तलखान्याला शिवसेनेने विरोध केला आहे. वाझा मोहल्ल्यात बैल, गाय, बछडे कापले जात आहेत. महापालिकेने कत्तलखाना उभारल्यास त्यांना परवानाच मिळेल, अशी भूमिका घेवून शिवसेनेने कत्तलखान्याला विरोध केला आहे.
विरोधी पक्षनेते विनायक निकम यांच्यासह जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, उपतालुकाप्रमुख अरुण चोरघे, विरार शहरप्रमुख दिलीप पिंपळे यांनी कत्तलखाना होऊ देणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
कत्तलखाना झाल्यास डॉक्टरांमार्फत तपासणी करून चांगल्या व निरोगी जनावरांची कत्तल करण्यात येईल. त्यामुळे लोकांना स्वच्छ मांस मिळेल. त्यामुळे कत्तलखाना झालाच पाहिजे, असे हिंदू खाटीक संघटनेचे अध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे ग्रामीणचे सरचिटणिस अशोक पेंढारी, अब्बास फौजी, सुभाष आदमने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.