नाथ वंशजांमध्ये मानपानाच्या नाटयामुळे नाथषष्ठीची दहीहंडी प्रशासनाला फोडावी लागली. दुस-या दिवशी नाथवंशजामध्ये वाटणीप्रमाणे साल बदलत असते.
औरंगाबाद – नाथ वंशजांमध्ये मानपानाच्या नाटयामुळे नाथषष्ठीची दहीहंडी प्रशासनाला फोडावी लागली. दुस-या दिवशी नाथवंशजामध्ये वाटणीप्रमाणे साल बदलत असते. त्यानुसार रावसाहेब गोसावी यांचे साल संपून रघुनाथ बुवा पांडव यांचे साल सुरू झाले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी ते समाधी मंदिरात ताबा घेण्यासाठी गेले असता दोन्ही बाजूच्या गटात हाणामारी झाली.
या प्रकरणी पोलिसात दोन्ही गटातील २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.संत एकनाथ महाराजाचे वंशज म्हणून वारक-यांमध्ये नाथवंशाजाविषयी आदरांची भावना आहे. अनेक वारकरी श्रद्धेने या मंडळींच्या पायाही पडतात.
मात्र त्या सर्व श्रद्धेला गालबोट लावून नाथ वंशजांनी थेट हाणामारी केल्याने भक्तामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू होता. कालाहंडी फोडण्याच्या ठिकाणी गेल्या ४१३ वर्षाची परंपरा मोडीत काढत
अखेर प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला.
मात्र नाथ वंशजातील वाद मिटला नव्हता. वास्तविक यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. रघुनाथ बुवा पांडव हे सकाळी ७.३० वाजता ताबा घेण्यासाठी गेले होते. तेथे रावसाहेब गोसावी आणि त्याच्या समर्थकांमध्ये थेट हाणामारी सुरू झाली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण थोडक्यात मिटवले.
या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात हरिपंडित रंगनाथबुवा गोसावी, पुष्कर मधुसूदन गोसावी, हृषीराज भानुदास गोसावी, विरेंद्र वासुदेव जहागीरदार, नामदेव जयराम गवळी, भगवान कृष्ण गोसावी, वासुदेव, सूर्यकांत जहागीरदार, जनार्दन विष्णू गोसावी, प्रदीप भगवान गोसावी यांच्या अन्य काही जणांविरुद्ध यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.