Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeकोलाजनांदेडवादी काँग्रेस

नांदेडवादी काँग्रेस

नांदेड महापालिका निवडणुकीतल्या विजयाने काँग्रेसने हुरळून जायचे कारण नाही. नांदेड सोडले तर काँग्रेस आहे कुठे? अशोक चव्हाण कागदावर प्रदेशाध्यक्ष असले तरी मैदानात फक्त जिल्ह्याचे नेते आहेत. नागपूरचे काँग्रेसवाले त्यांना कुठे मानतात? विरोधक मैदानात नसले तरी काहीतरी गडबड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे राज्यातले वातावरण आहे.

गेली तीन वर्षे काँग्रेसच्या पराभवाची चर्चा असायची. आज काँग्रेसच्या विजयाची चर्चा आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा अश्वमेध प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये रोखला. यासाठी चव्हाण यांचे अभिनंदन नक्कीच केले पाहिजे. पण, म्हणून काँग्रेसने हुरळून जावे असा हा विजय नाही. राज्यभर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल चार दिवसांत स्पष्ट होतील तेव्हा अनेकांची बोलती बंद होईल. ‘भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे’ असे चव्हाण म्हणाले. भाजपचे काय व्हायचे ते होवो. पण काँग्रेसच्या परतीचे काय? परतीला चव्हाणांनी दोर ठेवलेत कुठे? परतीचे दोर त्यांनी केव्हाच कापून टाकले. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत. पण कोण त्यांना मानायला तयार आहे? नागपूरच्या काँग्रेसच्या नेत्यांनी तर चव्हाण आणि मोहन प्रकाश यांना हटवा असे हायकमांडला भेटून सांगितले आहे. आज राज्यात काँग्रेसची जी अवस्था आहे त्याची जबाबदारी चव्हाण झटकू शकत नाहीत. नांदेडमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना ब्रेक लावला, त्याची वेगळी कारणे आहेत. तिथली स्थानिक समीकरणे वेगळी आहेत.

नांदेड हा चव्हाणांचा गड आहे. गेली १९ वर्षे तो चव्हाण कुटुंबाच्या हाती आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राज्यात नांदेड व हिंगोली अशा दोनच जागा काँग्रेस जिंकू शकली होती. नांदेड काँग्रेसचे. पण आजही नांदेडच्या नळाचे पाणी नांदेडचेच लोक पित नाहीत. मते मात्र चव्हाणांना टाकतात. आपल्याला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, त्यासाठी भाकरी उलटवावी असे तिथल्या मतदारांना वाटत नसेल का? एकेका गावचा स्वभाव असतो. यथा प्रजा, तथा राजा. नांदेडच्या निकालाची तुलना इतरांशी करता येणार नाही. जनमत वेगळ्या वाटेने चालले असे म्हणायचे तर मग राज्यात याच दिवशी झालेल्या चार पोटनिवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने का गेले असते? राज्यात काँग्रेसच्या पिछेहाटीमागे नेत्यांची संकुचित मानसिकता आहे. काँग्रेसी नेत्यांनी आपापले सुभे वाटून घेतले आहेत. मी आणि माझा मतदारसंघ. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत. पण नांदेडपलीकडे त्यांनी कधी गंभीरपणे पाहिले आहे का? विदर्भात, कोकणात काँग्रेसची घरे उद्ध्वस्त होत असताना हेच चव्हाण तमाशा पाहत राहिले. काँग्रेसवाल्यांनीच काँग्रेसला हरवले. त्यामुळे आज राज्यात काँग्रेस दिसते कुठे? नांदेड महापालिकेच्या निकालात ती दिसली. तिला फार फार तर ‘नांदेडवादी काँग्रेस’ म्हणता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस नाही का? तिच्या नावात राष्ट्र आहे. पण पश्चिम महाराष्ट्रापलीकडे ती दिसत नाही. तरीही आम्हाला राष्ट्रवादी म्हणा असा शरदरावांचा आग्रह असतो. या निकालाने दिल्ली दरबारात कदाचित अशोकरावांचे वजन वाढेल. पण काँग्रेसच्या तब्येतीचे काय? काँग्रेस दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. मेळघाटातल्या कुपोषित बालकासारखी. नांदेडच्या निकालापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने शिकण्यासारखे खूप आहे. इतर निवडणुकांप्रमाणे ही निवडणूकही मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे डझनभर मंत्री ठाण मांडून होते. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनीही सभा केली. जनाधार नसलेल्या नेत्यांच्या जोरावर माहोल बनवता येतो, पण जिंकता येत नसते. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे. कारण निवडणुका जवळ येताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष आहे. पण सध्याचे वारे पाहता सारा देश इलेक्शन मोडमध्ये गेल्याचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यातून आले त्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये म्हणजे अडीच महिन्यांनी होत आहेत. मोदींनी त्या प्रतिष्ठेच्या केल्याने गुजरातच नव्हे तर देशातले वातावरण तापले आहे. सोन्या-चांदीचे बहुसंख्य व्यापारी हे गुजरातमधले आहेत. जीएसटीमुळे ते नाराज होते. मोदींनी जीएसटी सोपा करून त्यांची नाराजी दूर केली. निवडणुकीवर डोळा ठेवूनच हा निर्णय केला गेला. बुलेट ट्रेनचे गाजर त्यातूनच आले. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशातला एक मोठा वर्ग नाराज आहे. त्याला गोंजारण्यासाठी ‘डॅमेज कंट्रोल’चे काम सुरू झाले आहे. अर्थव्यवस्था संकटात आल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर देशात मरगळ आहे. ती झटकण्यासाठी मोदींची टीम कामाला लागली आहे. विकासाचा चेहरा मागे पडत चालला असून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. अयोध्येत शरयू नदीच्या काठी प्रभू रामचंद्राचा विक्रमी उंचीचा पुतळा उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

तिकडे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आक्रमकपणे गुजरातमध्ये फिरू लागले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तीन वर्षाच्या साखरझोपेतून उठले असून त्यांनीही लोकपाल विधेयकासाठी आंदोलनाची तयारी चालवली आहे. निवडणुका जवळ येत चालल्याची ही लक्षणे आहेत. २०१४ साली देशाची सत्ता मिळवल्यानंतर भाजपने डझनभर राज्ये काबिज केली. काँग्रेसमुक्तीच्या दिशेने घोडदौड सुरू असताना गेल्या दोन महिन्यांत अचानक वातावरण बदलले. मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचे दिसल्याने लोक बोलू लागले. थेट अमित शहांच्या मुलाची भानगड बाहेर आली आहे. तीन वर्षात प्रथमच मोदीविरोध झळकू लागल्याने संघ परिवार हादरला आहे. १९ वर्षापासून सत्ता असलेल्या गुजरातमध्ये आता भाजपची सत्ता येईल का? अशी चर्चा चॅनेलवाल्यांनी सुरू केली आहे. प्रश्न केवळ गुजरात जिंकण्याचा नाही. गुजरातनंतर लगेच हिमाचल, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्याही निवडणुका आहेत. त्या संपतील तेव्हा २०१९ साल उजाडलेले असेल. या वर्षात लोकसभा आणि पाठोपाठ आंध्र, तेलंगण, ओडिशा आणि सिक्कीममध्ये रणधुमाळी आहे.

म्हणजे येत्या दीड-दोन वर्षात नुसती राजकीय धुमश्चक्री चालणार आहे. तशीही या सरकारची तीन वर्षे घोषणाबाजीत गेली. कसेही करून निवडणूक जिंकायची असल्याने आता विकास, सुशासन या गोष्टींमध्ये कोणाला रस उरणार आहे? गेल्या निवडणुकीत मोदी लाट होती. आज नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत राज्यांच्या निवडणुका घेण्याचा जुगार मोदी खेळण्याची शक्यता आहे. ‘सप्टेंबर २०१८ नंतर देशात एकाच वेळेला सर्व निवडणुका एकत्रित घ्यायला आम्ही तयार आहोत’ असे निवडणूक आयोगाने गेल्याच महिन्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभेसोबत महाराष्ट्र विधानसभेचीही निवडणूक लागली तर आश्चर्य वाटायला नको. तसला सर्जिकल स्ट्राईक मोदी करू शकतातआणि मोदींना ते सोयीचेही आहे. कारण गेली तीन वर्षे गप्प बसलेले लोक आता हिशोब मागू लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे म्हणजे नेमके काय केले पाहिजे? आता तोडफोडीच्या भानगडीत न पडता सोबत आहेत. त्या लोकांना घेऊन जनतेत जाण्याची गरज आहे. प्रशासन यंत्रणेवरची सरकारची पकड सुटत चालली आहे का? नोकरशाही महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवत आहे? तपासले पाहिजे. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन २० शेतक-यांचे जीव गेले. या घटनेला १५ दिवस उलटूनही मुख्यमंत्री तिथे गेले नाहीत. मुख्यमंत्री गेल्याने त्या शेतक-यांचे प्राण परत आले नसते. पण त्यातून हे सरकार शेतक-यांच्या पाठीशी असल्याचा ठोस संदेश गेला असता. या कामी सरकार व यंत्रणा कमी पडले आहे. शेतकरी कर्जमाफीचेही तसलेच भिजत घोंगडे करून ठेवले आहे. दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या हातात कर्जमाफी पडली नाही तर ही मोठी व्होटबँक उलटू शकते. याविषयी येणा-या वार्ता चिंता वाढवणा-या आहेत. मोदींना घेरणे सुरू झाले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल व शेतक-यांच्या प्रश्नांवरून नववर्षात नव्याने लोकआंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सात वर्षापूर्वी अण्णांनी भ्रष्टाचारमुक्तीसाठी लोकपाल नियुक्तीचा मुद्दा घेऊन देशव्यापी आंदोलन छेडले होते. केंद्र सरकारने लोकपालाचा कायदा केला. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेताच नसल्याने लोकपालाचा झिम्मा झाला आहे. लोकपाल नेमल्याने भ्रष्टाचार दूर होईल अशातला भाग नाही. पण हा विषय लोकांना आवडत असल्याने सत्ताधा-यांनी संवेदनशीलतेने हाताळला पाहिजे. अण्णांकडे पूर्वीची फौज नाही. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेवबाबा त्यांच्याकडे नाहीत. पण म्हणून अण्णांना कमजोर लेखणे चूक ठरेल. इश्यू लोंबता ठेवून प्रसिद्धी घेत राहणे हा अण्णांचा छंद राहात आला आहे. काँग्रेसने अण्णांचा ‘इगो’ वेळोवेळी सांभाळला. मोदी त्यांना कसे सांभाळतात ते पाहायचे. कारण अण्णांच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटल्याशिवाय राहणार नाहीत.

मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांपुढचा सर्वात नाजुक विषय राहणार आहे. दिवाळीनंतर विस्तार होणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. विस्तार करताना मुख्यमंत्र्यांचा कस लागणार आहे. कारण खूप सा-या घटकांना सोबत घ्यावे लागणार आहे. नाराजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा विस्तार छोटेखानीच राहण्याची शक्यता अधिक आहे. पण मुख्यमंत्र्यांना एकदा हे ‘ऑपरेशन’ करावेच लागेल. मुख्यमंत्र्यांनी समविचारी नेत्यांना सोबत घेऊन एनडीएची ताकद वाढवली पाहिजे. सुदैवाने नारायण राणे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता एनडीएमध्ये आला आहे. राणे यांच्या अनुभवाचा फडणवीस यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. राणे यांच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेचे आव्हान आता संपले आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये पूर्वीचा जोश उरलेला नाही. लोक नाराज आहेत. तरी भाजप आणि मोदींना पर्याय नाही ही गोष्ट लोक कबूल करतात. जुने दिवस आणायचे असतील तर, गेल्या तीन वर्षात घसरत चाललेला लोकांचा विश्वास नव्याने मिळवण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट