ऐन दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/06/Pregnant-woman-5748.jpg)
नवी मुंबई- ऐन दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. कोपरखैरणे येथे सेक्टर-१९ मधील विक्रांत कला निकेतन या गणपती कारखान्याला आग लागल्याने कारखाना जाळून खाक झाला.
मात्र प्रसंगावधान साधल्याने अनेक गणेश मूर्ती नागरिकांच्या मदतीने वेळीच हलवता आल्या. ही आग स्थानिक नागरिकांनी आसपासच्या इमारतींतून पाणी घेऊन विझवली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गोपीनाथ आगासकर, अभिजित म्हात्रे-चौलकर या नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली होती.
दरम्यान, वाशी येथे सेक्टर-९मधील एका डेकोरेटरच्या साहित्याला अचानक आग लागली. शेडला लागलेली आग अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने नियंत्रणात आली. हे साहित्य महापालिकेच्या समाज मंदिरात ठेवले असल्याने या आगीमुळे आता महापालिकेच्या जागेत हे साहित्य कसे आले, हा विषय ऐरणीवर आला आहे.