लोकसभा निवडणुकीच्या नवव्या अर्थात अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगाल ७९.०३, बिहार ५८ आणि उत्तर प्रदेशात ५५.२९ टक्के मतदान झाले.
नवी दिल्ली- लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सुरू असलेले मतदान दीड महिन्यानंतर सोमवारी संपले. नवव्या टप्प्यातही तीन राज्यातील ४१ मतदारसंघामध्ये भरघोस मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये ७९.०३ टक्के, बिहारमध्ये ५८ टक्के आणि उत्तर प्रदेशात ५५.२९ टक्के मतदान झाले. तर वाराणसीत ५५.२३ टक्के मतदानाची नोंद झाली.
आता सर्वाचे लक्ष येत्या १६ मे रोजी होणा-या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. उत्तर प्रदेशातील १८ जागा, बिहार ६, पश्चिम बंगालमधील १७ जागांवर सोमवारी मतदान झाले.
यात भाजप नेते नरेंद्र मोदी, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल, कॉँग्रेसचे अजय राय तसेच मुलायम सिंह यादव, सुदीप बंदोपाध्याय, दिनेश त्रिवेदी, सौगाता रॉय, तपस पॉल आदींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
होय आम्ही मतदान केले (फोटो गॅलरी)
राज्य | मतदानाची टक्केवारी |
उत्तरप्रदेश | ५५.२९ टक्के |
पं.बंगाल | ७९.०३ टक्के |
बिहार | ५८ टक्के |
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीमध्ये ५५.२३ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये या मतदारसंघात ४२ टक्के मतदान झाले होते.
काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रांत बंद झाले. मोदी, केजरीवाल आणि अजय राय या दिग्गजांच्या लढतीमुळे वाराणसीवर संपूर्ण देशाचे लक्ष असून, वाराणसीत मत‘वॉर’ होणार आहे.
जाणून घ्या लोकसभा निवडणुकीचे टप्पे आणि किती टक्के झाले मतदान
भाजप नेते नरेंद्र मोदी, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते अजय राय, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव आदी दिग्गज नेत्यांसह ६०६ उमेदवारांचे भवितव्य ९ कोटींहून अधिक मतदार ठरवणार आहेत.
या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १८, पश्चिम बंगालमधील १७ आणि बिहारमधील ६ जागांवर मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधून केंद्रीय मंत्री अधिर रंजन, डोमरियागंज येथून जगदंबिका पाल, केंद्रीय राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह कुशिनगर येथून आणि राजद नेते रघुवंश प्रसाद सिंह बिहारमधून निवडणूक लढवत आहेत.
आतापर्यंत झालेल्या पंधरा लोकसभा निवडणुकांचा निकाल
या निवडणुकीत आतापर्यंत ६६.२७ टक्के मतदान झाले असून १९८४नंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीतील टक्केवारी वाढली आहे. २००९मधील निवडणुकीत केवळ ५७.९४ टक्के मतदान झाले होते. मतदानाची ही टक्केवारी अखेरच्या टप्प्यातही कायम राहील, अशी आशा असून गेले ३५ दिवस चाललेल्या निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार आहे.
‘मोदी रा. स्व. संघाच्या हातातील बाहुले’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मोदी आणि राजनाथ सिंह यांनी भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे संघाच्या हातातील बाहुले असून, ते त्यांच्याच आदेशानुसार चालणारे आहेत, अशी टीका काँग्रेसने रविवारी केली. भाजप हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच तालावर नाचतो. ही गोष्ट देशातील जनतेला गेल्या अनेक वर्षापासून माहीत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केजरीवालांना नोटिस
भाजप किंवा काँग्रेसला मतदान केल्यास हा देवाचा आणि देशाचा अपमान ठरेल, असे वक्तव्य करणा-या ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटिस पाठवली. केजरीवाल यांनी सकृतदर्शनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगत त्यांनी १३ मे रोजी संध्याकाळी आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले.