धर्मातर झाल्याशिवाय हिंदू महिला व ख्रिश्चन पुरुषाचा विवाह अवैध असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. हा विवाह वैध ठरायचा असल्यास दोघांपैकी एकाने धर्मातर करायला हवे, असे न्यायालयाने सुचवले आहे.
मदुराई – धर्मातर झाल्याशिवाय हिंदू महिला व ख्रिश्चन पुरुषाचा विवाह अवैध असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. हा विवाह वैध ठरायचा असल्यास दोघांपैकी एकाने धर्मातर करायला हवे, असे न्यायालयाने सुचवले आहे.
या प्रकरणी निकाल देताना उच्च न्यायालयाचे न्या. पी. आर. शिवकुमार व व्ही. एस. रवी यांनी सांगितले की, या दाम्पत्याला त्यांचा विवाह हिंदू चालीरितीनुसार करायचा असल्यास ख्रिश्चन पुरुषाने हिंदू व्हायला हवे. तर ख्रिश्चन चालीरितीने विवाह करायचा असल्यास मुलीला आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला हवा.
या दाम्पत्याला धर्मातर न करता त्यांच्या धर्माचे आचरण करायचे असल्यास विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत त्यांच्या विवाहाची नोंदणी केली जावी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
या विवाहाला मुलीच्या पालकांनी आक्षेप घेऊन न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आपले म्हणणे मांडताना विवाहितेने सांगितले की, माझा विवाह पलानी येथील मंदिरात झाला. तर तुमचे पती धर्मातरित झाले नसल्याने तुमचा विवाह वैध कसा ठरू शकतो, असा सवाल न्यायालयाने या विवाहितेला केला.
मात्र, या विवाहितेने विवाह केलेल्या पुरुषासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर न्यायालयाने सांगितले की, सदर विवाहिता सज्ञान आहे. ती तिच्या मर्जीने निर्णय घेऊ शकते. मात्र, तिचा विवाह कायदेशीर नाही, असे पीठाने सांगितले.