जोपर्यंत धर्मांतरावर बंदी आणली जात नाही तोपर्यंत घरवापसी सुरुच राहणार असे विधान भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
रोहतक – जोपर्यंत धर्मांतरावर बंदी आणली जात नाही तोपर्यंत घरवापसी सुरुच राहणार असे विधान भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
धर्मांतरामुळे देशातील जातीय सलोखा नष्ट होता. धर्मांतरावर बंदी आणणे गरजेचे आहे. जर धर्मांतर सुरुच राहिले तर मला वाटते घरवापसी सुरुच राहील असे त्यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतसमोर गरिबी आणि कुपोषण ही समस्या नसून ‘वोट बँक’चे राजकारण ही मोठी समस्या आहे. हिंदू समाजात प्रत्येकाला सुरक्षित वाटते. प्रत्येक माता आणि भगिनींना सुरक्षितता वाटते. मात्र मुस्लिम भागांमध्ये असुरक्षितता का वाटते? जर भारत-पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यात भारत जिंकला तर ते विजय साजरा करत नाही मात्र भारत हरल्यास तो विजय ते फटाके फोडून साजरा करतात. असे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला