पालघर जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन विषबाधा घटनेत इस्कॉन फाऊंडेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.
मुंबई – पालघर जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन विषबाधा घटनेत इस्कॉन फाऊंडेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात इस्कॉन संस्था दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे दिले. पालघर जिल्ह्यातील कासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना २५ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली.
या शाळेत इस्कॉन फाऊंडेशन या संस्थेकडून पुरविण्यात येत होते. मात्र अद्याप या संस्थेवर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अन्य ११ सदस्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्या. त्यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर देताना, या सर्व प्रकरणाची शिक्षण आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास इस्कॉन संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले.