देशात स्वाईन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होत असून यावर्षात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत तब्बल ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली– देशात स्वाईन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. यावर्षात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत तब्बल ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
१२ फेब्रुवारीपर्यंत देशात स्वाईन फ्लूने तब्बल ४८५ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार १२ ते १५ फेब्रुवारी या तीन दिवसांत आणखी १०० जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.
राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. राजस्थानात आतापर्यंत १६५, गुजरातमध्ये १४४, मध्यप्रदेश ७६ आणि महाराष्ट्रात आतापर्यंत ५८ जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेला आहे. १५ फेब्रुवारी रोजी राजस्थानात १२ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद आहे तर मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एका दिवसात आठ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
स्वाईन फ्लूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या राजस्थान आणि गुजरातमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील अधिका-यांनी दिली.