देशात गेल्या तीन महिन्यांत ३२ हवाई अपघात झाले. या अपघातांमध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सोमवारी लोकसभेने दिली.
नवी दिल्ली – देशात गेल्या तीन महिन्यांत ३२ हवाई अपघात झाले. या अपघातांमध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सोमवारी लोकसभेने दिली.
या पूर्वी २०११ मध्ये सर्वाधिक अपघातांची नोंद होती. या वर्षात अपघातांच्या १२ घटना घडल्या होत्या. यामध्ये तवंग येथे घडलेल्या एम आय-१७२ या हेलिकॉप्टर अपघाताचाही समावेश होता. यामध्ये सुमारे १९ जण ठार झाले होते.
तर २०१२ आणि २०१३ मध्ये हवाई अपघाताच्या प्रत्येकी ८ घटना घडल्या, अशी माहिती नागरी विमान खात्याचे राज्यमंत्री महेश शर्मा यांनी प्रश्नोत्तराच्या तसात दिली. २०१४ मध्ये आपत्कालीन काळात विमान उतरवण्याचे प्रमाण कमी झाले. २०११ मध्ये दहा आणि २०१२ मध्ये अशा सतारा घटना नोंदवण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ विमान अपघातांसाठी अत्यंत धोकादायक आहे. पक्षी आणि प्राण्यांनी धडक देण्याच्या या वर्षात ५५८ घटना घडल्या असून, यापैकी १४२ घटना इंदिरा गांधी विमानतळावर घडल्या आहेत.
या विमानतळावर गेल्या दोन वर्षात अपघाताच्या शेकडो घटना नोंदवण्यात आल्या. यामध्ये इंदिरा गांधी विमानतळावर १३१, मुंबई ८४ आणि ७८ घटना अहमदाबाद विमान तळावर नोंदवण्यात आल्या आहेत. यावर्षी दिल्ली विमानतळावर प्राणी आणि पक्षी धडकण्याच्या सुमारे १४२ घटना नोंदवण्यात आल्या. तर कलकत्ता आणि मुंबई विमानतळावर अनुक्रमे ६२ आणि ६० घटनांची नोंद करण्यात आली.
केंद्रीय हवाई वाहतूक महासंचालनालयाने वन्य जीवांचा वावर असणारी १८ विमानतळे आहेत, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. यापैकी ११ विमानतळांचे यापूर्वीच परीक्षण झाले आहे. तसेच पर्यावरण व्यवस्थापन समिती नेमून याबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.