राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी,पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशवासियांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी,पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशवासियांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशबांधवांना होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व देशामध्ये प्रसन्नता निर्माण होईल. सप्तरंगांचा हा सण राष्ट्रीय मूल्य अधिक मजबूत करतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी विविधतेत एकता तसेच सर्व लोकांमध्ये समानतेच्या विचारांना रंगपंचमीमुळे प्रगल्भता मिळते असे सांगत देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रंगपंचमीचा हा उत्सव हा जीवनाला सकारात्मक दृष्टीकोन देणारा सण आहे. या सणामुळे देशामध्ये बंधूभाव वृद्धींगत होतो. होळी आणि रंगपंचमीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटले आहे.