२०१३ ते २०१४ या वर्षभरात दिल्ली मेट्रोच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीमध्ये १४० टक्के वाढ झाली आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/11/CRIME.jpg)
नवी दिल्ली – २०१३ ते २०१४ या वर्षभरात दिल्ली मेट्रोच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीमध्ये १४० टक्के वाढ झाली आहे. पाकिटमारी, मोबाईल चोरी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
दिल्ली मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे त्याचवेळी गुन्हेगारीचे प्रमाणही वाढल आहे. दिल्ली मेट्रो नेहमीच प्रवाशांनी भरलेली असते केंद्रीय गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी ही माहिती दिली. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तराव्दारे त्यांनी ही माहिती दिली.
गुन्हेगारीत वाढ होण्यामागे त्यांनी कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. २०१३ मध्ये दिल्ली-एनसीआर मेट्रोच्या हद्दीत ९६२ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१४ मध्ये हा आकडा २३०९ पर्यंत पोहोचला. जून २०१५ पर्यंत हा आकडा १७६९ आहे