मानवासह प्राणी-पक्षांनाही पाण्याची गरज असते. उन्हाच्या झळा लागल्यानंतर माणूस कासावीस होतो.. तो पाण्याचा शोध घेतो, तोच कित्ता प्राणी-पक्षीही गिरवतात. ठाण्यातील उपवन तलाव म्हणजे प्राणी-पक्षांना मस्तपैकी मौजमजा करण्याचे आवडीचे, हक्काचे ठिकाण. या तलावात सध्या प्राणी-पक्षांचे संमेलन भरल्याचे पहावयास मिळते. तहानेने व्याकुळ झालेले कावळे आपली तहान भागवत पाण्यातच आपल्या साथीदारांशी काहीशी मजा करण्यासाठी वेळ काढतात. तर माकडही त्यात मागे नाहीत. तेही मस्तपैकी थंड थंड पाणी एन्जॉय करतात. प्राणी व पक्षांची ही ‘थंडे थंडे पानी में नहाना चाहिए’.. ची मस्ती कॅमेरात टिपली आहे आमचे छायाचित्रकार कुणाल म्हात्रे यांनी…