Thursday, July 4, 2024
Google search engine
Homeकोलाजत्यांचेही पाय मातीचेच..!

त्यांचेही पाय मातीचेच..!

आजपासून बरोबर १३ दिवसांनी आपण भारताचा ६८वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आपल्या समृद्ध लोकशाहीला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमक्या प्रजासत्ताकाच्या ६० व्या दशकांत आपण ‘साठी बुद्धी नाठी’ दर्शवणा-या अनेक घटना सध्या अनुभवतो आहोत.

लोकशाहीच्या परिपक्वतेच्या या काळात दिवसागणिक नैसर्गिक आपत्तींसोबत मानवनिर्मित आपत्तींची मालिकाच सध्या अवघा देश अनुभवतो आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचे जबाबदार घटक असणा-या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी शुक्रवारी आपले वरिष्ठ सरन्यायाधीश अर्थातच न्या. दीपक मिश्रा आपल्याला सापत्नभावाची वागणूक देतात, मनमानी करतात, केसेसचे वर्गीकरण योग्यप्रकारे करत नाहीत, प्रत्येक मोठय़ा केसमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो, मग ती केस एन्काउंटरची असो वा महाविद्यालयीन प्रवेशाची, राजकीय भ्रष्टाचाराची असो वा अगदी जातीय दंगलीची, असे अनेक आरोप या न्यायमूर्तींनी करतानाच सामान्य जनतेसमोर आपले गा-हाणेच मांडले आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटकांची ही अवस्था असेल, तर मग सामान्यजनांनी कुठे जायचे? त्यांनी या सर्वातून काय बोध घ्यायचा, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.

खरे तर या पत्रकार परिषदेनंतर देशभरातून उमटणा-या प्रतिक्रिया आणि मान्यवरांकडून येणा-या माहितीवर नजर टाकली तर खिन्नपणाने असेच विचारावेसे वाटते की, तीन कोटींपेक्षा अधिक खटले देशभरातील वरिष्ठ, कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहेत. दर दोन मिनिटांला एक तरुणी लैंगिक अत्याचाराला, तर दर तासाला अनेक महिला बलात्काराच्या प्रसंगाला सामोरे जातात. देशभरातल्या कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात कार्यरत असणारा एकही कर्मचारी समाधानी नाही. नोटाबंदी, जीएसटीच्या फटक्यानंतर लाखो तरुण बेरोजगार झालेत, तर अनेकांनी हा ताण असह्य होत आयुष्य संपवले आहे. राज्यातील व्हीडिओकॉनसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने अचानक कोणतेही कारण न देता कर्मचा-यांना १२ दिवसांची सक्तीची रजा दिली आहे, तर अनेक आयटी कंपन्यांतून कर्मचा-यांना तडकाफडकी नारळ दिले गेले. शेतक-यांचे आत्महत्या सत्र थांबता थांबेना, तर कर्जमाफी लाभार्थीपर्यंत पोहोचताना दिसत नाही. देशभरात कितीतरी ठिकाणी प्रलंबित खटले मार्गी लावावेत आणि कमीत कमी अंतरावर न्यायदानाचे ठिकाण असावे यासह अनेक कारणांनी मागणी आणि गरज असूनही नव्याने खंडपीठांची निर्मिती होत नाही. सरकारी नोकरभरती पूर्णपणे थांबलेली आहे. देश एका प्रचंड नैराश्येच्या छायेखाली वावरतो आहे. अशा कितीतरी समस्या सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून सोडवाव्यात याकरिता या चार आदरणीय, ज्येष्ठ न्यायदात्यांनी पत्रकार परिषद घेतली असती, तर आज कदाचित ते देशाचे हिरो ठरले असते. मात्र तसे न होता वीस वर्षानंतरच्या निवृत्तीनंतर आपल्या आयुष्यात काही वादळ येऊ नये याची तजवीज करण्याची पराकाष्ठाच त्यांनी घेतलेल्या प्रेस प्रकरणात झाकोळते आहे. मुळातच आजवर किती ज्येष्ठ न्यायाधीशांवर कारवाई झाल्याची इत्थंभूत माहिती सामान्यांपर्यंत पोहोचली आहे..? मग यांनाच का वीस वर्षानंतर होणा-या आरोपांची भीती वाटावी? म्हणजे न्यायमूर्तींचे पायही मातीचेच आहेत, असे सामान्य नागरिकांनी समजायचे का..? सामान्यांना पडणारेच प्रश्न एक पत्रकार म्हणून भेडसावतात, म्हणूनच हा लेखप्रपंच.

अनेकांनी या प्रकरणात असेही आरोप केले की, या पत्रकार परिषदेच्या वेळी दिल्लीतील एक ज्येष्ठ पत्रकार आणि एका डाव्या पक्षाचा नेता आदी मंडळीही उपस्थित होती. मग ही सरळ सरळ मोदी सरकार विरोधातील बंडाळी आहे का? असे असेल तर मग न्या. दीपक मिश्रा राजकीय अमलाखाली निर्णय घेतात, असा अंगुलीनिर्देश करण्याला कोणता नैतिक आधार राहतो? दुसरीकडे असाही मतप्रवाह समोर येतो आहे, तो म्हणजे गुजरातच्या निवडणुकीदरम्यान आक्रमक झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील आक्रमकता आता सार्वत्रिक होऊ लागली आहे का? यापूर्वी राहुल गांधींना अनुल्लेखाने मारणा-या भाजपच्या नेत्यांनीही गुजरात निवडणुकीत राहुल गांधींच्या आक्रमकपणाचा निर्णायक अनुभव घेतला आहे. आज एकटय़ा महाराष्ट्राचा विचार केला, तर सत्ताधा-यांच्या विरोधातील प्रचंड असंतोष सामान्यांमध्ये धुमसतो आहे. मुख्यमंत्री एककलमी निर्णय प्रक्रिया राबवतात. इतर कोणत्याच मंत्र्यांना त्यात स्थान नसते. कोणताच निर्णय ते योग्य वेळेत घेत नाहीत.

गत तीन वर्षात समाज जातीयतेच्या आधारावर दुभंगतो आहे आणि याची गंभीर झळ ग्रामीण भागात जाणवते आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेटलेला दलित अन् सवर्ण हा वाद राज्याचे कोटय़वधींचे नुकसान करणारा आणि समाजातील तेढ वाढवणारा ठरला, पण त्याचे सत्ताधा-यांना काहीच सोयरसुतक नाही. राज्याची राजधानी आणि देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात एक नंबरचे व्यापार केंद्र म्हणून ख्याती असणा-या मुंबईचा जीव दिवसागणिक गुदमरतो आहे. ठरावीक अंतरावर ट्रॅकवर पळणा-या रेल्वे जर वेळेत धावल्या नाहीत, तर प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा उरत नाही. इथे कोणत्याही पुलावर केव्हाही गुदमरून प्रवाशांचे आयुष्य संपू शकते. इथे आयुष्यभराची लाखोंची पुंजी गुंतवली तरी वर्षानुवर्षे स्वत:ची हक्काची घरे ताब्यात मिळत नाहीत आणि सरकार परवडणा-या घरांची स्वप्ने दाखवत राहते. मुंबईत रोजीरोटीसाठी रोज लाखो तरुणांचे, बेरोजगारांचे लोंढे येतात आणि मुंबईतल्या रस्त्यांवर आपला संसार थाटतात. रस्त्यातच गाडय़ांखाली मरतात, पण सरकार मात्र डिजिटल महाराष्ट्रात मग्न आहे. मुंबईत होणारी गुंतवणूक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या गरजा ओळखून, विभागणी करून करण्याचा किमान प्रयत्न जरी केला तरी मुंबईत येण्यापेक्षा आपापल्या गावात, शहरांतच रोजी-रोटी कमवावी, असे प्रत्येकाला वाटेल. त्या त्या गावातील नैसर्गिक अन् मानवनिर्मित उपलब्धी लक्षात घेत सरकारने असे प्रयोग करावेत आणि केवळ संपूर्ण महाराष्ट्र मुंबईत एकवटण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईसारखी अनेक शहरे आकाराला आणावीत. जेणेकरून कोणालाच बेघर व्हावे लागणार नाही. आपल्या जमिनी, आपली माणसे यांच्यापासून दूर यावे लागणार नाही. अशा काही सूचना सल्लावजा जरी या चार न्यायमूर्तीनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये केल्या असत्या तरी ते लोकशाहीचे खंदे पाईक ठरले असते. अमेरिकेनेही भारतात होणा-या महिलांविषयक अत्याचाराच्या घटनांमधील वाढ पाहून चिंता व्यक्त करावी, इतकी आपली जागतिक प्रतिमा बदलते आहे. या सर्व अस्वस्थतेवर जर या महान न्यायमूर्तींनी काही दिलासादायक उपाय सुचविले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते. पण तसे झाले नाही!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट