नेहमी घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबापूरी ‘त्या’दिवशी खिन्न झाली. १२ मार्च १९९३ च्या दिवशी दुपारी दीड ते साडेतीन या दोन तासांच्या कालावधीत विविध १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबईसह संपूर्ण जगाला हादरवून टाकले. या बॉम्बस्फोटाची मालिका कशी होती, त्याबद्दल…
>पहिला स्फोट,दुपारी १ वाजून ३० मिनिटे – मुंबई शेअर बाजार – ८४ जणांचा मृत्यू तर २१७ जणं गंभीर जखमी
>दुसरा स्फोट, दुपारी २ वाजून १५ मिनिटे – नरसी नाथा पथ – पाच जणांचा मृत्यू १६ जणं जखमी
>तिसरा स्फोट, दुपारी २ वाजून ३० मिनिटे – शिवसेना भवन – चार जणांचा मृत्यू, ५० जखमी
>चौथा स्फोट, दुपारी २ वाजून ३३ मिनिटे – एअर इंडिया इमारत – २० जणांचा मृत्यू, ८७ जखमी
>पाचवा स्फोट, दुपारी २ वाजून ४५ मिनिटे – माहिम कॉजवे – तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी
>सहावा स्फोट, दुपारी २ वाजून ४५ मिनिटे – सेंच्यूरी बाजार – ११३ जणांचा मृत्यू, २२७ जखमी
>सातवा स्फोट, दुपारी ३ वाजून पाच मिनिटे – झवेरी बाजार, १७ जणांचा मृत्यू, ५७ जखमी
>आठवा स्फोट, दुपारी ३ वाजून १० मिनिटे – सी रॉक हॉटेल, वांद्रे
>नववा स्फोट, दुपारी ३ वाजून १३ मिनिटे – प्लाझा सिनेमा दादर, १० जणांचा मृत्यू,३७ जखमी
>दहावा स्फोट, दुपारी ३ वाजून २० मिनिटे – जुहू सेंटॉर हॉटेल – तीन जणं जखमी
>अकरावा स्फोट, दुपारी ३ वाजून ३० मिनिटे – सहार विमानतळ
>बारावा स्फोट, दुपारी ३ वाजून ४० मिनिटे – एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल – दोन जणांचा मृत्यू, आठ जखमी
बॉम्बस्फोटाचे सुत्रधार –
या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक नागरिकांना प्राण गमावला लागला. तर ७०० हून अधिकजण ज़ख़मी झाले होते. या बॉंम्बस्फोटात प्रामुख्याने गर्दीच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. या घटनेचा सूत्रधार टायगर मेमन आणि त्याचे साथीदार त्याच दिवशी देशाबाहेर पळून गेले.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनिस इब्राहिम यांनी आखलेल्या या कटाची अमंलबजावणी इब्राहिम अब्दुल रझाक मेमन उर्फ टायगर मेमन याने केली होती.
या प्रकरणातील दाऊदची स्मगलिंगची कामे पाहणारा मुस्तफा डोसा आणि बॉम्बस्फोट करणार्यासाठी आलेल्या हत्यारांचे वाटप करणारा गँगस्टर अबू सालेम यांना नंतर भारतात आणले. त्यांच्यावर वेगळ्या प्रकरणांसंदर्भात अन्य खटले सुरु आहेत.
या प्रकणात १२ जणांना टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली…
> याकूब मेमन
> मोहम्मद शोएब घनसार
> असगर युसूफ मुकादम
> अब्दुल गनी तुर्क
> परवेझ नझीर शेख
> मोहम्मद फारुख पावले
> शहानवाज कुरेशी
> झाकिर हुसेन नूर मोहम्मद शेख
> अब्दुल अख्तर खान
> फिरोझ अमीन मलिक
> मुश्ताक तराणी
> मोहम्मद इक्बाल
या आरोपींपैकी मोहम्मद इक्बाल याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. तर अन्य २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेच्या वीसपैकी दोघांचा मृत्यू झाला. हा खटला गेली वीस वर्ष सुरु होता.
या खटल्याला २० वर्ष कालावधी लागल्याने फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.