गेल्या तीन वर्षात वेगवेगळया दुर्घटनांमध्ये भारतीय हवाई दलाला २९ लढाऊ विमाने गमवावी लागली आहेत
नवी दिल्ली – गेल्या तीन वर्षात वेगवेगळया दुर्घटनांमध्ये भारतीय हवाई दलाला २९ लढाऊ विमाने गमवावी लागली असून, या अपघातांमध्ये आतापर्यंत सहा वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.
लढाऊ विमानांच्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक अपघात मिग-२१ विमानाला झाले आहेत. आतापर्यंत बारा मिग-२१, आठ मिग-२७, चार एसयू-३० एमकेआयएस, दोन जॅग्वार, दोन मिराज-२००० आणि एका मिग-२९ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत असे संरक्षण मंत्री ए.के.अँटोनी यांनी सांगितले.
या अपघातांमध्ये सहा वैमानिक तर सहा सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. जिवीतहानी बरोबर ३० नागरी मालमत्ताचे नुकसान झाले. वैमानिकांच्या कुटूंबियांना ६० लाखाची तर नागरिकांच्या कुटूंबियांना ४०.४ लाखांची भरपाई देण्यात आली. भारतीय वायूदलाकडे सध्या ५१५ वैमानिकांची कमतरता असली तरी, सध्याची क्षमता गरजांचा विचार करता पुरेशी आहे असे अँटोनी यांनी सांगितले.