उल्हासनगर महापालिका क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई आहे. त्याचा फायदा उचलण्यास पाणीपुरवठा व टँकर माफियांनी सुरुवात केली आहे.
उल्हासनगर – उल्हासनगर महापालिका क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई आहे. त्याचा फायदा उचलण्यास पाणीपुरवठा व टँकर माफियांनी सुरुवात केली आहे. या टँकरमाफियांनी ९०० रूपये दरात मिळणारा टँकर अडीच ते तीन हजार रूपयांपर्यंत विकण्यास सुरूवात करून नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणे सुरू केले आहे. त्यामुळे या खासगी टँकर व पाणीमाफियांना लगाम घालण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्राला प्रति आठवडा होणा-या ११८० एमएलडी पाणीपुरवठयात कपात करून तो ५८० एमएलडीवर आणण्यात आला आहे. त्यामुळे टोकाकडच्या भागात पाणी पोहोचत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच पालिकेने टँकर बंद केल्यामुळे नागरिकाना पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
पूर्वी ५ हजार लिटरचा टँकर ७०० ते ९०० रूपयांपर्यंत मिळत होता. मात्र पाणीकपातीमुळे अचानक मागणी वाढल्याने टँकरचालकांनी ५ हजार लिटरच्या टँकरचा भाव २ हजार ते अडीच हजार रूपये आणि ७ हजार लिटर टँकरचा भाव हा अडीच ते तीन हजार रूपयांपर्यंत वाढवला आहे. तसेच एवढी रक्कम मोजूनही टँकरसाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे उल्हासनगरवासी पुरते त्रासले आहेत.
जे रहिवासी उल्हासनगरातील उंच भागात राहातात. अशा ठिकाणी सखल भागाच्या तुलनेत पुरेसे पाणी पोहोचत नसल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई इतर भागाच्या तुलनेत तीव्र आहे. याचा गैरफायदा घेत टँकर आणि पाणीमाफिया जादा दराने अशा उंच भागात पाणी पुरवत आहेत. वरच्या परिसरात पाणी मागवण्यासाठी अशा भागातील रहिवाशांना जादा दराचे आमिष दाखवावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.
याबाबत टीम ओमी कालानीचे सदस्य सुमित चक्रवर्ती यांनी सांगितले की, टँकरवाल्यांनी दरात तीन पट वाढ केली असताना पालिका, सरकार आणि पोलीस याबाबत कुठलीही कारवाई का करत नाहीत, ही बाब निंदनीय आहे. याबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले की, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात खासगी टँकरमार्फत पुरविले जाणारे पाणी हे बोअरवेल आणि विहिरीचे आहे.
हे जलस्रोत जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणात असल्याने ते पालिकेच्या ताब्यात देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच दोन दिवसांत पालिका क्षेत्रातील खासगी पाणीटँकर वितरकांची बैठक घेणार असून त्यांचे दर प्रक्रिया कापडणीस यांनी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी कॅम्प १ परिसरातील निश्चित केले जाणार आहेत.
जलकुंभांना पाणी पोहोचविणा-या वाहिन्यांवरील जोडण्या तोडणे सुरू
जलकुंभांना पाणी पोहोचविणा-या वाहिन्यांवरून घेतलेल्या जोडण्या या उल्हासनगर महापालिकेच्या पाणी वितरण प्रणालीला लागलेली मुख्य कीड आहे. यामुळे पाणी पुरवठा योग्य दाबाने होत नाही आणि जलकुंभ भरत नाहीत. तसेच पाणी वितरणात भेदभाव होत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे, ही बाब जाणून पालिकेचे उपायुक्त नितिन कापडणीस यांनी या जोडण्या तोडण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी या जोडण्या घरोघरी पाणी पुरवठा करणा-या वाहिन्यांवर हलविण्याचीही सात जोडण्या या आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी हटविल्या.