केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेनेसोबतची युती लवकर तुटली असतील तर स्वबळावर सत्ता मिळवता आली असती असे म्हटले आहे.
भोपाळ- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्तास्थापन केले असतानाच पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेनेसोबतची युती लवकर तुटली असतील तर स्वबळावर सत्ता मिळवता आली असती असे म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेना यांची २५ वर्षापासून असलेली युती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुटली, दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यावेळी सर्वांचा अंदाज होता भाजपला ७० ते ७५ जागा मिळतील. पण प्रत्यक्षात भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला. दोन्ही पक्षांमधील युती अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी तुटली. तीच आणखी १० ते १५ दिवस आधी तुटली असतील तर भाजपला स्पष्ट बहूमत मिळाले असते असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
देशात पुढील महिन्यात होणा-या जम्मू-काश्मीर आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळेल असा विश्वास सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.