संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव केल्यास त्यांच्या झेंडय़ाखाली भारत इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव केल्यास त्यांच्या झेंडय़ाखाली भारत इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्यास तयार आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले आहे.
अमेरिकन संरक्षणमंत्री अॅशटन कार्टर यांच्याशी अत्यंत महत्त्वाच्या बैठकीहून परतल्यावर पर्रिकर यांनी सांगितले की, इसिसविरोधात भारताकडे असलेली गुप्तचर माहिती इतरांना दिली जात असून त्यात वाढ करण्यात येईल. राष्ट्रसंघाने ठराव केला, तर त्यांच्या झेंडय़ाखाली व त्यांच्या मोहिमेत भारतीय सैन्य सहभागी होईल, असे पर्रिकर म्हणाले. अमर जवान ज्योती येथे विजय दिवसानिमित्त पुष्पचक्र अर्पण केल्यावर ते बोलत होते. सध्या वीस भारतीय तरुण इसिसकडून इराक आणि सीरियात लढत आहेत. त्यात दोन कल्याणच्या युवकांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी कल्याणमधील एक युवक सीरियात सहा महिने घालवून परतला होता. त्यास मुंबईत आल्यावर लगेच अटक करण्यात आली होती. इसिसच्या बाजूने लढून जे सहा भारतीय युवक ठार झाले, त्यात तीन इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी होते. गेल्या महिन्यात इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून युनायटेड अरब अमिरातीने तीन तरुणांना परत पाठवले होते. १७ तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले असून त्यापैकी बहुतेक सारे तेलंगण
राज्याचे होते.