बंदरपट्टी गावांची तहान भागवणा-या बाडापोखरण आणि २९ गावांच्या ४१ कोटी ११ लाख ९७ लाख ३९ हजार रकमेच्या महत्त्वाकांक्षी ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गुरुवारी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
डहाणू – ठाणे जिल्ह्यातील डहाणू आणि पालघर तालुक्यांतील बंदरपट्टी गावांची तहान भागवणा-या बाडापोखरण आणि २९ गावांच्या ४१ कोटी ११ लाख ९७ लाख ३९ हजार रकमेच्या महत्त्वाकांक्षी ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला गुरुवारी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
या योजनेचा लाभ डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू, तडीयाळे, गुंगवाडा, पोखरण, बहाड, वाढवण, वासगाव, वरोर, चंढीगाव, धूमकेत, माडगाव, आसनगाव, चिंचणी, तणाशी, वाणगाव आदी गावांसह पालघर तालुक्यातील ११ गावांना मिळणार आहे. या योजनेसाठी पालकमंत्री गणेश नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी मंत्रालयात अनेकदा पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळेच ४३ कोटींची ही योजना अखेर निविदा प्रक्रियेपर्यंत येऊन ठेपली आहे.
या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निविदा प्रक्रियेच्या कामास तातडीने सुरुवात करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. या योजनेस ९५ टक्के इतके सरकारी अनुदान मिळणार असून ५ टक्के लोकवर्गणीचा हिस्सा असणार आहे. योजना मंजून झाल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण असून, पाण्यासाठी वर्षानुवर्षे लढलेल्या लढय़ाला अखेर आल्याची यश आल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत.