पुढल्यावर्षी भारतामध्ये होणा-या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.
नवी दिल्ली – पुढल्यावर्षी भारतामध्ये होणा-या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.
११ मार्च ते तीन एप्रिल दरम्यान रंगणा-या विश्वचषक स्पर्धेचे सामने आठ शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली.
बंगळूरु, चेन्नई, धर्मशाळा, मोहाली, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली आणि कोलकाता या आठ शहरांमध्ये सामने होणार आहेत. उपांत्यफेरीच्या दोन सामन्यांपैकी एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.
इडन गार्डन्स जगातील क्रिकेटच्या मोठया मैदानांपैकी एक असून, ब-याच वर्षांपासून येथे मोठा सामना झालेला नाही. १९८७ साली भारतात झालेल्या पन्नास षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इडन गार्डन्सवर झाला होता. त्यानंतर १९९६ मध्ये भारत विरुध्द श्रीलंका विश्वचषकाच्या उपांत्यफेरीचा सामनाही याच मैदानावर झाला होता.