रेल्वे तिकिट आरक्षित करणा-या प्रवाशांना यापुढे नियोजित रेल्वे गाडी रद्द झाली तर, मोबाईलवर संदेश पाठवून ट्रेन रद्द झाल्याची आगाऊ माहिती कळवली जाईल.
नवी दिल्ली – रेल्वे तिकिट आरक्षित करणा-या प्रवाशांना यापुढे नियोजित रेल्वे गाडी रद्द झाली तर, मोबाईलवर संदेश पाठवून ट्रेन रद्द झाल्याची आगाऊ माहिती कळवली जाईल.
काही कारणास्तव ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून ही नवी प्रवासीभिमुख एसएमएस सुविधा सुरु करण्यात आली आहे.
सध्या प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु करण्यात आली असून, काही रेल्वे स्थानकांपुरता ही योजना मर्यादीत आहे. काही कारणास्तव ट्रेन रद्द झाली तर, प्रवाशांना मोबाईलवर एसएमएसव्दारे ट्रेन रद्द झाल्याची माहिती दिली जाते. हळूहळू या सुविधेचा विस्तार केला जाणार आहे.
ऑनलाईन किंवा पीआरएस खिडकीवरुन तिकिट आरक्षित करताना प्रवाशी जो मोबाईल नंबर नोंदवतील त्यावर एसएमएस पाठवला जाईल. ऐनवेळी प्रवाशांना हा एसएमएस पाठवला जाणार नाही.
प्रवाशांना बराचवेळ आधी हा एसएमएस पाठवला जाईल जेणेकरुन त्यांना प्रवासासाठी दुसरा पर्याय निवडता येईल. रेल्वेचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग सीआरआयएसने या सुविधेसाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे.