गेल्या नऊ वर्षात उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३३६ जणांचा मृत्यू झाला तर ३१०७ जण जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे.
नवी दिल्ली- गेल्या नऊ वर्षात उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये ३३६ जणांचा मृत्यू झाला तर ३१०७ जण जखमी झाल्याचे उघडकीस आले आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २००५ ते २०१४ या नऊ वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये १२७१ जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यापैकी २०१४ मध्ये ५६ घटनांची नोंद झाली असून त्यामध्ये १० जणांचा मृत्यू तर १४४ लोक जखमी झाले आहेत.
२००५ ते २०१४ या नऊ वर्षामध्ये झालेल्या १२७१ घटनांमध्ये ३३६ जणांचा मृत्यू झाला तर ३१०७ जण जखमी झाले.
सर्वात जास्त जातीय हिंसाचाराच्या घटना २०१३ साली २४७ इतक्या नोंदवल्या गेल्या. ज्यामध्ये ७७ जणांचा मृत्यू झाला तर ३६० जण जखमी झाले, असे गृह मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.