गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये ८६ पट वाढ झाल्याचे राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
अमेठी- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहिर केली आहे. गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये ८६ पट वाढ झाल्याचे राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील अन्य उमेदवारांची संपत्ती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
२००९मध्ये राहुल गांधी यांची संपत्ती चार कोटी ४० लाख इतकी होती. त्यात आठ कोटी २० लाख रुपयांची वाढ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे मुल्य दुप्पट झाल्याने ही वाढ झाली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची एकही गाडी नाही.