शेअर बाजार कोसळत असताना आणि बँका बुडित कर्जामुळे संकटात सापडल्या असताना ७.६ टक्के विकास दराचे भाकीत लक्षणीय आहे, अशी अर्थ मंत्रालयाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
नवी दिल्ली- शेअर बाजार कोसळत असताना आणि बँका बुडित कर्जामुळे संकटात सापडल्या असताना ७.६ टक्के विकास दराचे भाकीत लक्षणीय आहे, अशी अर्थ मंत्रालयाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
सरकार जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज आहे, असे अर्थ व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.
बाजारातील अस्थिरता आणि गोंधळ पाहिल्यावर विकासाचे ७.६ टक्क्याचे भाकीत निश्चितच लक्षणीय आणि अत्यंत महत्त्वाचे आहे, असे दास म्हणाले. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने २०१५-१६ मध्ये विकास दराच्या ७.६ टक्के उद्दिष्टात सध्याच्या परिस्थितीतही भारताची टिकून राहण्याची क्षमताच प्रतिबिंबित होते, असे दास म्हणाले.
जगभरातच देशांना शेअर बाजार आणि चलनी बाजारात गोंधळाला सामोरे जावे लागत असून भारत त्यास अपवाद नाही. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात रोज काहीतरी नवीन घडते आणि ते नवीन आव्हान असते, असे त्यांनी सांगितले.
बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरता हा नवा निकष बनला आहे, असे सांगून दास म्हणाले की, आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आमची नजर आहे. भारतात कृषी क्षेत्रात आव्हाने असून दोन वर्षे सलग दुष्काळ पडला आहे.
त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या चार वर्षात पाऊस पुरेसा पडलेला नाही. त्यामुळे कृषी उत्पादन खाली गेले आहे. मातीतील आद्र्रतेमुळेही जमिनीचा कस कमीहोत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असे दास यांनी सांगितले.