देशातील आघाडीचे नेटवर्क रेडिओ सिटी ९१.१ एफएमने आणि दलमंदई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने ‘जल हैं तो कल हैं’ अभिनयान हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना टँकरद्वारे पाणी पुरवले जाणार आहे. या अभियानासाठी रेडिओ सिटीने व्यासपीठ देऊ केले आहे, जिथे लोकांना या सामाजिक कार्यासाठी धनादेश, इंटरनेट बँकिंग आणि डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे देता येतील.
दुष्काळग्रस्त गावे आणि शेतक-यांना आर्थिक मदत करण्यासाठी रेडिओ सिटीने ‘रग रग मैं दौडे’ या नुकत्याच लाँच केलेल्या अभियानाशी सुसंगत असे आवाहन आपल्या प्रेक्षकांना केले आहे. दुष्काळाचा मोठा फटका बसलेल्या देऊळगाव सिद्धी येथील श्रीकृष्ण वाडी या भागाला रेडिओ सिटीने नुकतीच भेट दिली.
इथे कित्येक दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो आणि पाण्याची बचत करण्यासाठी लोक महिन्यातून एकदाच आंघोळ करतात. रेडिओ सिटीने तळी, टँकर्स आणि विहिरी भरल्या. रेडियो स्टेशनने पैसे गोळा करण्यात यश मिळवले असून त्यातून अहमदनगर येथील ८५ गावे आणि १५ जंगलांना ३५ लाख लिटर्सपेक्षा जास्त पाणीपुरवठा केला आणि दुष्काळग्रस्त भागांसाठी १३ हजार लिटर्स पाण्याचे टँकर्स पाठवले.
या अभियानाविषयी अब्राहम थॉमस, मुख्य कार्यकारी अधिकारी, रेडिओ सिटी, ९१.१ एफएम म्हणाले, ‘महाराष्ट्रातील शेतक-यांच्या समस्या मांडण्यासाठी ‘जल हैं तो कल हैं’ या अभियानाअंतर्गत आमच्या व्यासपीठाचा प्रभावी वापर करून दुष्काळग्रस्तांची व्यथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवत त्यांना या सामाजिक कार्यासाठी मदत करण्याची संधी दिली जात आहे. ३५ लाख लिटर्सपेक्षा जास्त पाणी पुरवण्यासाठी भरभरून योगदान देणा-या श्रोत्यांच्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. हे आणखी एक रग रग मैं दौडे अभियान म्हणावे लागेल.’
२५ मे रोजी रेडिओ सिटीची आर. जे. अर्चना आणि मुंबईतील सकाळचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कसं काय मुंबई’ विथ सलील अँड अर्चना आणि टीमने पाण्याच्या टँकर्ससह अहमदनगरला भेट दिली आणि संपूर्ण दिवस ते व त्यांच्या कुटुंबाबरोबर घालवत पाणी मिळवण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समजून घेतला. त्यांना पाणी पुरवण्याचे रेडिओ सिटीचे अभियान यशस्वी झाले. तिथले शेतकरी साधी राहाणी, उच्च विचारसरणी या तत्त्वाचे उत्तम उदाहरण होते. त्यांनी रेडिओ सिटीच्या टीमला मोठया आनंदाने साधेसुधे घरगुती, महाराष्ट्रीय जेवण वाढले आणि सगळ्यांसाठी ऑग्रेनिक आंबा लोणचे पॅक करून दिले. शेतक-यांच्या कुटुंबीयांनी आर. जे. बरोबर डान्स केला आणि त्यांना पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन चालण्याचे आव्हानही दिले. रेडिओ सिटीच्या श्रोत्यांनी त्यांच्यासाठी पाठवलेल्या ध्वनिफिती ऐकून ते सगळे भारावून गेले होते.
त्या संदेशांनी गावक-यांचे मनोबळ वाढवलेच, शिवाय आपली दखल घेतली जात आहे ही भावना त्यांच्या मनात निर्माण केली गेली. हा सगळा अनुभव फेसबुक लाईव्हवर लाईव्ह रिले केला गेला आणि महाराष्ट्रातील शेतक-यांच्या कष्टाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी रेकॉर्ड करून श्रोत्यांसाठी ऑन एअर ऐकवला गेला.
तसेच या अभियानाद्वारे संपूर्ण देशाला फायदा करून देणा-या शेतक-यांच्या प्रयत्नांची दखल घेण्याचे व त्यांच्या मेहनतीची कदर करण्याची भावना सर्वाच्या मनात निर्माण करण्याचे ध्येय रेडिओ सिटीने ठेवले आहे.
‘चहूकडे पाणीच पाणी आणि प्यायला एक थेंबही नाही ही म्हण आजच्या काळात खरी ठरली आहे. दुष्काळामुळे खरोखरचं वाईट परिस्थिती ओढवली आहे आणि आता भारताने जागे होऊन, सर्वानी एकत्र येत उपाययोजना पुरवण्यासाठी मदत करणे गरजेचे झाले आहे’ असे हे अभियान राबवण्यासाठी रेडिओ सिटीशी सहकार्य करणा-या दलमंदई फाऊंडेशनचे स्वयंसेवक पवन गांधी यांनी सांगितले.