डान्स बारबंदीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन लावण्या बंद करण्याचे सूतोवाच फडणवीस सरकारने केले आहे.
मुंबई – डान्स बारबंदीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन लावण्या बंद करण्याचे सूतोवाच फडणवीस सरकारने केले आहे. असे असले तरी जोपर्यंत चारा छावण्या सुरू होत नाहीत आणि धिगांणा घालणा-या लावण्या बंद होणार नाहीत तोपर्यंत फडणवीस सरकारला सुटकेचा श्वास घेऊ देणार नाही, असा सज्जड इशारा विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फडणवीस सरकारला दिला.
बुधवारपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘डान्स बार बंदी’साठी नवा कायदा आणण्यासंदर्भात राज्य सरकार अनुकूल असल्याचे सूतोवाच फडणवीस सरकारने केले आहे. हा सूतोवाच म्हणजे जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी
दिली आहे.
डान्स बारवरील बंदी सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सर्व कायदेशीर पर्यायाचा विचार करावा. गरज असेल तर विधीमंडळात नवा कायदा आणावा. विरोधीपक्ष त्या कायद्याला संपूर्ण सहकार्य करील. असे आम्ही दोन महिन्यांपासून जाहीर केले होते. परंतु त्यासाठी सरकारने आजपर्यंत वेळकाढूपणा का केला, हेच कळत नाही. सरकारला उशीरा का होईना परंतु शहाणपण सुचले आहे. आता अधिक वेळ न घालवता सरकारने तातडीने नवा कायदा आणला पाहिजे.
डान्स बारबंदीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन लावण्या बंद करण्याचे सूतोवाच केले असले तरी जोवर छावण्या व्यवस्थित सुरू होत नाहीत, म्हणजेच दुष्काळी कामांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही, तोवर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.