आयएमईआयमध्ये बदल करणे दंडनीय गुन्हा
नवी दिल्ली – मोबाईल चोरीवर नियंत्रणासाठी केंद्र सरकार लवकरच एक नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. चोरी गेलेल्या किंवा गायब झालेल्या मोबाईल फोनच्या सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत. ही व्यवस्था सिम कार्ड काढल्यानंतर तसेच आयएमईआय क्रमांक बदलल्यानंतरही सर्व नेटवर्कवर काम करेल. त्यामुळे मोबाईल चोरीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मोबाइल चोरांना याचा काहीच फायदा होणार नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) ही नवी प्रणाली सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरसाठी (सीईआयआर) सॉफ्टवेअर तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक विकासाची जबाबदारी देण्यात आली होती. कंपनीला आपल्या पुणे येथील केंद्रातून सहा महिन्यांपयर्ंत याचे प्रायोगिक तत्त्वावर परीक्षण करायचे आहे.
बनावट मोबाईल फोन्सची संख्या घटवणे तसेच मोबाईल चोरीवर नियंत्रण मिळवणे हा सीईआयआरचा हेतू आहे. यामध्ये ग्राहक हिताच्या रक्षणासह कायदेशीररीत्या आवाज टॅप करणे (इंटरसेप्शन) तपास यंत्रणांसाठी सोपे जाणार आहे. दूरसंचार विभागाच्या या योजनेनुसार सीईआयआरप्रणाली आयएमईआय डाटाबेस सर्व मोबाईल ऑपरेटरांबरोबर जोडण्यात येणार आहे.
सीईआयआर काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या मोबाइल टर्मिनलला (सेट) सर्व नेटवर्क ऑपरेटरमध्ये वितरीत करण्यासाठी केंद्रीय प्रणालीच्या रूपात काम करते. यामुळे आवश्यक त्या श्रेणीमध्ये एका नेटवर्कमध्ये ठेवण्यात आलेले ते उपकरण दुस-यांत कार्यरत राहू शकत नाही. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सिम कार्ड बदलण्यात येईल. संबंधित व्यक्तीला हँडसेटची माहिती व्हावी यासाठी आयएमईआय क्रमांक सांगावा लागतो. आयएमईआय ही १५ अंकी संख्या आहे, जी जागतिक औद्योगिक संघटना जीएसएमएकडून वितरीत करण्यात येते.