२५ वर्षापूर्वी मी हिंदी चित्रपटसृष्टीत आलो, त्या वेळी इतके यश मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आजपर्यंत मी जे काही यश मिळवले आहे त्यामागे माझे सहकारी, सहकलाकार आणि प्रेक्षकांचा वाटा आहे, असे मत अभिनेता आमिर खानने व्यक्त केले.
मुंबई – २५ वर्षापूर्वी मी हिंदी चित्रपटसृष्टीत आलो, त्या वेळी इतके यश मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, आजपर्यंत मी जे काही यश मिळवले आहे त्यामागे माझे सहकारी, सहकलाकार आणि प्रेक्षकांचा वाटा आहे, असे मत अभिनेता आमिर खानने व्यक्त केले. केलेल्या चुकांमधूनच शिकत गेल्यामुळे आजचे यश मिळाल्याचे आमिरने सांगितले. या वेळी त्याने २५ वर्षातील चित्रपटसृष्टीतील अनुभवांचा प्रवास उलगडला.
‘तारें जमीं पर’साठी काम करताना एका मानसोपचारतज्ज्ञांना भेटलो. ते म्हणाले होते की, माणसांना जगण्यासाठी सुरक्षितता, विश्वास, सन्मान व प्रेमाची गरज असते. प्रेक्षक आणि सर्वाच्या प्रेमामुळे या सर्व गोष्टी मिळाल्याचे समाधान आमिरने व्यक्त केले. आव्हाने स्वीकारणे आवडते, त्यामुळेच नव्या विषयांना घेऊन चित्रपट करत असल्याचे आमिरने स्पष्ट केले.
कारकीर्दीच्या सुरुवातीला मी विचार न करता चित्रपट स्वीकारले. त्यामुळे त्यातील अनेक चित्रपट अयशस्वी ठरले. मात्र या केलेल्या चुकांमधून मी शिकत गेलो व आजचे यश मिळाल्याचेही आमिरने सांगितले. माझ्या माहितीचा, प्रतिष्ठेचा वापर समाजाच्या हितासाठी व्हावा, या उद्देशानेच मी ‘सत्यमेव जयते’ ही मालिका केली, असे सांगतानाच आमिरने त्याच्या पुढील चित्रपटांविषयी बोलण्याचे मात्र खुबीने टाळले.