चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झँगबो नदीवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यारलंग झँगबो ही नदी भारतात ब्रम्हपुत्रा नदीच्या नावाने ओळखली जाते.
बिजींग – चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झँगबो नदीवर धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यारलंग झँगबो ही नदी भारतात ब्रम्हपुत्रा नदीच्या नावाने ओळखली जाते.
चीनने बांधलेल्या या धरणामुळे भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली आहे कारण या धरणामुळे भारत आणि बांगलादेशात पूरस्थिती निर्माण होऊ शकते तसेच भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे. यामुळे लाखो नागरीकांचे जीव धोक्यात येऊ शकतात.
भारताने वेळोवेळी या प्रकल्पाबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केली आहे. चीनने यावर जे स्पष्टीकरण दिले त्यावर आतापर्यंत भारतीय अधिकारी समाधानी आहेत. मात्र चीनच्या या प्रकल्पामुळे अरुणाचलप्रदेशमधून वाहणा-या नदीच्या प्रवाहावर परिणाम होणार आहे तसेच ईशान्य भारतातील काही नद्यांचा प्रवाह बाधित होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले.
ब्रम्हपूत्रा ही हिमालयातून वाहणारी सर्वात मोठी नदी असून, तिबेटच्या वरच्या भागात ही नदी आहे. तिबेटमधील हा सर्वात मोठा हायड्रोपावर प्रकल्प असून, याव्दारे चीन वीज निर्मिती करणार आहे. समुद्रसपाटीपासून ३,३०० मीटर उंचीवर चीनने हे धरण बांधले आहे.