चित्तूर येथील रक्तचंदन चोर प्रकरणात ठार झालेल्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी हैदराबाद येथील शासकीय रुग्णालयातील तीन डॉक्टरांचे पथक चेन्नईत दाखल झाले आहे.
चेन्नई- चित्तूर येथील रक्तचंदन चोर प्रकरणात ठार झालेल्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी हैदराबाद येथील शासकीय रुग्णालयातील तीन डॉक्टरांचे पथक चेन्नईत दाखल झाले आहे.
चित्तूर येथे पोलीस व संशयित रक्तचंदनचोर यांच्यात झालेल्या चकमकीत २० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेहांचे नव्याने शवविच्छेदन करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार हैदराबाद उच्च न्यायालयाने पाच मृतदेहांची पुन्हा उत्तर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
ओस्मानिया रुग्णालय अथवा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय चेन्नईमध्ये जाऊन पुन्हा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ओस्मानिया शासकीय रुग्णालयातील तक्वीद्दीन खान, अभिजीत सुभेदार, आणि केव्ही रमन्ना यांचे पथक चेन्नईमध्ये दाखल झाले आहे.