अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मेहुण्याने नागपुरात केलेल्या महाप्रतापाच्या बातम्या सगळीकडे झळकलेल्या आहेत. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कोणी कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; परंतु सार्वजनिक जीवनात नेते मंडळी, शासनाच्या पदांवरील मंडळी यांच्या नातेवाईकांनी काही पथ्य पाळणे, अतिशय गरजेचे आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मेहुण्याने नागपुरात केलेल्या महाप्रतापाच्या बातम्या सगळीकडे झळकलेल्या आहेत. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कोणी कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; परंतु सार्वजनिक जीवनात नेते मंडळी, शासनाच्या पदांवरील मंडळी यांच्या नातेवाईकांनी काही पथ्य पाळणे, अतिशय गरजेचे आहे.
जेव्हा सत्तेत बसलेल्या व्यक्तीचे नातेवाईक त्यांच्या सत्तेचा उपयोग करून लाभ मिळवतात किंवा अन्य गैरफायदा घेतात, त्यावेळी त्यांना रोखण्याची जबाबदारी सत्तेत बसलेल्यांची असते. सुधीर मुनगंटीवार यांचे सख्खे मेहुणे डॉ. मकरंद व्यवहारे यांनी ज्या काही भानगडी केल्या असतील त्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील भानगडी आहेत.
सार्वजनिकरित्या त्याची दखल घेण्याचे कारण नाही.?कारण अशा घटना अनेक ठिकाणी करणारे महाउपद्व्यापी लोक आहेतच. आक्षेप आहे तो डॉ. व्यवहारे यांनी त्यांच्या जीवनातला व्यवहार कसा ठेवावा, याबद्दलचा नाही तर त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींना पाठी घालण्याचे काम आणि आपल्या मेहुण्याला संरक्षण देण्याचे काम मुनगंटीवार आपले मंत्रीपद वापरून करत आहेत, त्याला आहे. शिवाय ते ज्या वैद्यकीय खात्यात काम करतात, त्या वैद्यकीय खात्याचे मंत्री विनोद तावडे हेही मंत्री म्हणून त्यांचे अधिकार वापरून मुनगंटीवारांच्या मेहुण्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आक्षेप आहे तो या दोन गोष्टींचा. जर व्यवहारे दोषी असतील. त्यांच्या विरुद्ध काही भगिनींनी तक्रार केलेली असेल तर त्याची चौकशी होऊन त्यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईल आणि तसे झाले तर तो तो त्या त्या व्यक्तीचा खासगी मामला ठरेल; परंतु या प्रकरणात तसे घडलेले नाही. उलट अर्थमंत्री मुनगंटीवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या चुकीच्या कृत्याला हे मंत्रिमहोदय पाठीशी घालत आहेत.
ज्या महिलेने डॉ. व्यवहारे यांच्या विरोधात तक्रार केली त्या तक्रारीची चौकशी त्या महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू निसवडे हे करीत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांची बदली केली. हा विषय नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे गेला.
हे प्रकरण तेव्हापासून गंभीर झाले. नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आणि त्याच्याही पुढे सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या डॉ. निसवडे यांची बदली विनोद तावडे यांनी आकसाने केलेली आहे, त्याबद्दल कडक शब्दात ताशेरे ओढून उच्च न्यायालयाने या बदल्या रद्द केलेल्या आहेत. मुनगंटीवार आणि तावडे यांच्या हेतुबद्दलच त्यामुळे शंका निर्माण होते. कोर्टाने थेट प्रश्न विचारला की, ही बदली मुळात केलीच कशी आणि का केली आहे? या प्रश्नांमध्येच बदली करण्याचा हेतू संशयास्पद आहे, ही गोष्टही सिद्ध झालेली आहे.?
एका परीने उच्च न्यायालयाने बदल्या स्थगित करताना या दोन्ही मंत्री महोदयांवर ठपका ठेवलेला आहे. ‘या बदल्या केल्याच कशा?’ या वाक्यातच तो ठपका आहे आणि एक गोष्ट उघड आहे. आपल्या मेहुण्याला वाचवण्याकरिता अर्थमंत्र्यांनी हा दबाव आणला असणार आणि सहकारी मंत्री म्हणून विनोद तावडे या दबावाला बळी पडले असणार. त्यामुळे चौकशी करणा-याचीच बदली हा प्रकार घडला.? त्याला वाचा फुटली.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षाने विधान मंडळात हा विषय लावून धरला पाहिजे. याचे आणखी एक कारण असे आहे की, भाजपाचे सगळे नेते?आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत, याचा ठेका घेतलेले नेते आहेत.?चारित्र्याच्या गप्पा मारणे, ही गोष्ट भाजपावाल्यांसाठी भूषण मानली गेलेली आहे. आता आपल्या मेहुण्याने ज्या काही भानगडी केल्या असतील त्याला अर्थमंत्री आणि त्यांचे मित्र वैद्यकीय शिक्षणमंत्री हे संरक्षण देतात आणि स्वच्छ चारित्र्याची भाषणे पुन्हा जोरदारपणे देतात.
भाजपा सार्वजनिक जीवनात वावरताना जसा ढोंगी पक्ष आहे, तसा व्यक्तिगत जीवनातही तो ढोंगी आहे. एक मिनिटासाठी अशी कल्पना करू या की, जर काँग्रेस राजवटीत काँग्रेसच्या अर्थमंत्र्याने आणि वैद्यकीय मंत्र्याने अशा भानगडी करणा-या आपल्या मेहुण्याला संरक्षण दिले असते तर हेच तावडे, मुनगंटीवार, गडकरी, पंकजा, खडसे, फडणवीस या अर्धा डझन टोळीने चारित्र्यावर केवढी मोठी भाषणे दिली असती. विधानसभेत किती गोंधळ घातला असता.
काँग्रेसचे ज्येष्ठ?नेते पवन बन्सल हे रेल्वेमंत्री असताना त्यांच्या भाच्यावर रेल्वेतील महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्यासाठी १० कोटी घेतल्याचा आरोप झाला.?पवन बन्सल यांच्यावर थेट आरोप झाला नव्हता. तरीसुद्धा त्यांना रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना १२ जानेवारी १९८२ रोजी न्यायमूर्ती लेंटीन यांनी ठपका ठेवला. त्यांना राजीनामा द्यावा लागला.
१९८५-८६ काळात शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलीचे गुण वाढवण्यास सांगण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसने कधीही कोणत्याही चुकीच्या कामाला पाठीशी घातलेले नाही आणि संबंधित व्यक्तीला किंमत चुकवावी लागलेली आहे.
भाजपा हा एकमेव निर्ढावलेला, निल्र्लज पक्ष असा आहे की, या पक्षातील मंत्र्यांवर ढीगभर आरोप झाल्यानंतरही त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. व्यापम घोटाळयातील साक्षीदारांपैकी ४८ साक्षीदारांच्या हत्या झाल्या. शिवराजसिंह चौहान अजून मुख्यमंत्री पदावर बसलेलेच आहेत. तीच गोष्ट वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्याबाबतीत आहे. तेव्हा या चारित्र्याच्या गप्पा मारणा-यांचा बुडबुडा फुटलेला आहे. आता न्यायालय नेमका निर्णय देईलच.