Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeसंपादकीयविशेष लेखघोळाची पुनरावृत्ती नको

घोळाची पुनरावृत्ती नको

लोकसभा निवडणुकीत मुंबई-पुण्यासारख्या अनेक शहरात मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ झाल्याचे समोर आले. हजारो मतदारांची नावे कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने वगळून टाकली. यामुळे संतप्त होऊन अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही मतदारांची जबाबदारी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हा घोळ टाळण्यासाठी मतदारांनी आतापासूनच सजगता दाखवण्याची गरज आहे. यासाठी मतदारांनी आपले नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे बनले आहे. तसेच नवीन नाव नोंदणीबाबत आयोगाच्या सूचनांवर लक्ष ठेवून ती नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष यादीत नावाची खातरजमा करण्याची जबाबदारी मतदारांना पार पाडावी लागेल. मागील निवडणुकीत मतदान केले म्हणजे, या वेळच्या मतदार यादीतही आपले नाव आपोआप येईल, अशा समजुतीत राहणे धोक्याचे ठरेल.

voter-list-photo-IDया वेळची लोकसभा निवडणूक निदान महाराष्ट्रापुरती तरी मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे गाजली. पुण्या-मुंबईसह अनेक शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ होते. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली होती. तर काही हयात मतदारांना यादीमध्ये मृत म्हणून दाखवण्यात आले होते. पुण्यात ५० ते ६० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली होती. एवढया मोठया प्रमाणात नावे वगळली गेल्यामुळे या प्रकरणाचा मोठा बोभाटा झाला. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळे थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाही घोळाची दखल घ्यावी लागली. काही मतदारांनी या घोळाविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पुण्यातील काही मतदारांनी आपली नावे यादीतून वगळण्याबाबत केलेल्या याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुण्यात फेरमतदान घेण्याची मागणी फेटाळून लावली. मात्र त्याचवेळी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला खडे बोलही सुनावले. आणखी चार-पाच महिन्यांनी होणा-या राज्यातील विधानसभा निवडणुकीत या घोळाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, असे उच्च न्यायालयाने बजावले आहे.

एकीकडे संपूर्ण राज्यात मतदारांचा टक्का लक्षणीयरीत्या वाढलेला दिसत असताना दुसरीकडे मतदार यादीतील घोळाचा दुर्दैवी प्रकार उजेडात आला. मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक आयोगाची नाचक्की झाली. या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या. निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा, फक्त निवडणुकीच्या तोंडावरच कार्यान्वित करण्याऐवजी ती सतत कार्यान्वित ठेवावी, यासाठी आयोगाला स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जावा, अशा अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. मतदार याद्यांमध्ये घोळ कसे झाले, याचा शोध घेत असताना पुण्यासारख्या शहरात जवळपास पावणेतीन लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती, असे निष्पन्न झाले आहे. ठाणे जिल्ह्यात एका गावामध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीपर्यंत १७०५ एवढे मतदार होते. मात्र लोकसभा निवडणुकी वेळी १७०० मतदारांची नावे वगळली गेल्याचे व फक्त पाच जणांची नावे यादीत राहिल्याचे दिसून आले. मतदार याद्यांमधील हा अक्षम्य घोळ आयोगाच्या अत्यंत बेजबाबदार कर्मचा-यांमुळे झाला आहे. मतदार याद्यांमधून नाव वगळण्यासाठी एक शासकीय प्रक्रिया आखून देण्यात आली आहे. जे मतदार मृत्युमुखी पडलेले असतील किंवा ज्यांनी आपले राहण्याचे ठिकाण, गाव, मतदार संघ बदलले असतील तर अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी निवडणूक आयोग प्रक्रिया पार पडत असते.

नाव वगळण्यापूर्वी संबंधित अधिका-याने मतदाराच्या पत्त्यावर जाऊन प्राथमिक चौकशी करावी लागते. निधन झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी संबंधितांच्या नातेवाइकांनाच पुढाकार घ्यावा लागतो. ज्या व्यक्तीचे निधन झाले असेल त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी संबंधित अधिका-यांकडे अर्ज करावा लागतो. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या दुरुस्तीचे काम जेव्हा सुरू केले जाते तेव्हा मृत्युमुखी पडलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया चालू होते. तसेच ज्यांचा राहण्याचा पत्ता बदलला असेल अशांनी आपले नाव मतदार यादीतून वगळावे असा अर्ज केला असेल तर त्याबाबतची प्रक्रिया मतदार यादीतील दुरुस्तीवेळीच हाती घेतली जाते. मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया ही जिल्हाधिका-यांच्या अधिकाराखालील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचा-यांमार्फत पार पाडली जाते. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात येतो. या अधिका-याच्या मदतीसाठी बुथ लेव्हल ऑफिसर नेमले जातात. ही कामे प्राथमिक अथवा माध्यमिक शिक्षकांच्या माध्यमातून केली जातात. एखाद्या मतदाराचे नाव वगळायचे असेल तर निवडणूक आयोगाला नोटीस द्यावी लागते. यादीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित मतदार राहात नाही असे दिसून आले तर बुथ लेव्हल ऑफिसर तसा अहवाल आपल्या वरिष्ठांकडे देतात. ज्या वेळी मोठया प्रमाणात मतदारांची नावे काही कारणांमुळे कमी करावयाची असतात त्या वेळी प्रशासनाने त्या त्या गावांतील प्रमुख वृत्तपत्रांतून प्रकटन द्यावे लागते. चुकीचा पत्ता, मतदार यादीत दोन वेळा नाव असणे अशा काही कारणांमुळे निवडणूक आयोगाकडून मतदारांची नावे वगळण्याचे काम केले जाते. अनेकदा ज्या मतदारांचा पत्ता बदललेला आहे अशा मतदारांना जिल्हा निवडणूक अधिका-याकडून म्हणजे जिल्हाधिका-याकडून नोटीस काढली जाते.

मतदार याद्यांमध्ये नोंदवलेले पत्ते अपूर्ण किंवा चुकीचे आहेत, असे दिसल्यावर मतदार त्या पत्त्यावर राहतो असे दिसून येत नाही. त्यामुळे या मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात यावे असे बुथ लेव्हल ऑफिसरकडून सांगितले जाते. संबंधित वरिष्ठ अधिकारी बुथ लेव्हल ऑफिसरकडून आलेल्या अहवालावर विसंबून राहतात आणि त्या मतदाराचे नाव यादीतून वगळून टाकतात. प्रत्येक निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने दुरुस्त केलेल्या मतदार याद्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रसिद्धीस दिल्या पाहिजेत, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य आयोगाला नेहमीच दिल्या जातात. मात्र या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची तसदी निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी घेत नाहीत. मतदार यादीत घोळ होतात, ते या पद्धतीमुळे.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मतदार यादीमध्ये काहीही बदल करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी आपले नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे बनले आहे. निवडणूक आयोगाकडून आपल्या संकेतस्थळावर सुधारित मतदार याद्या प्रसिद्ध केलेल्या असतात. या यादीमध्ये आपले नाव आहे की, नाही याची खातरजमा करून घेण्याचे कर्तव्य मतदाराला स्वत:हून पार पाडावे लागते. मागच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत मतदान केले म्हणजे, या वेळच्या मतदार यादीतही आपले नाव आपोआप येईल अशा समजुतीत राहणे धोक्याचे ठरेल. प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांना निवडणूक आयोगाच्या गलथान यंत्रणेचा अनुभव आला. आपले नाव पुण्यातील मतदार यादीतून का वगळले गेले याचा शोध पालेकरांनी घेतला. त्या वेळी त्यांना मतदार याद्या तयार करत असताना संबंधित सरकारी अधिका-यांकडून कसा निष्काळजीपणा दाखवला जात आहे, हे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखादी व्यक्ती अथवा कुटुंब मतदार संघातून दुस-या मतदार संघात राहायला गेले असेल तरच त्या व्यक्तीने अथवा कुटुंबाने आपल्या निवासाचा पत्ता बदलला असे समजावे. मात्र या वेळी मतदार याद्या अद्ययावत करताना अधिका-यांनी एखाद्या घराला कुलूप आढळल्यास किंवा एखाद्या पत्त्यावर न सापडलेल्या मतदारांना सरसकट यादीतून वगळण्याचे काम केले. समजा त्या व्यक्तीने अथवा कुटुंबाने संबंधित मतदार संघाच्या बाहेर स्थलांतर केले नसले तरी त्याचे नाव स्थलांतराचे कारण देऊन वगळले जाते. मतदार याद्या तयार करण्याचे किंवा अद्ययावत करण्याचे काम देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने किती गरजेचे आहे हे संबंधित सरकारी अधिका-यांच्या लक्षात आणून दिले जात नाही. त्यामुळेच एरवीच्या सरकारी कामांप्रमाणे मतदारांची नावे वगळण्याचे काम अक्षरश: उरकले जाते. ज्या शिक्षक मंडळींकडून ही कामे करून घेतली जातात त्या शिक्षक मंडळींवर आपली नियमित कामे संभाळून ही कामे सोपवली जातात. त्यामुळे शिक्षक मंडळी ही अशैक्षणिक कामे अनिच्छेने करत असतात. मतदार याद्या तयार करणे आणि अद्ययावत करणे हे काम प्रशिक्षित कर्मचा-यांकडूनच करून घेणे योग्य ठरते. निवडणूक आयोगाला स्वतंत्र कर्मचारी वर्ग उलब्ध करून दिला तर, त्यांना आयोगाच्या सर्व कामांचे प्रशिक्षण देता येऊ शकेल. मतदार याद्या जास्तीत जास्त निर्दोष बनवण्यासाठी अशा प्रशिक्षित कर्मचा-यांची गरज आहे. नेहमीच्या शासकीय शिरस्त्याप्रमाणे कामे झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीतही याद्यांमध्ये घोळ होतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट