गोव्यात पुन्हा एकदा मध्यान्ह भोजन जेवल्यानंतर शालेय विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली आहे.
पणजी – गोव्यात पुन्हा एकदा मध्यान्ह भोजन जेवल्यानंतर शालेय विद्यार्थी आजारी पडले आहेत. पेरनेम तालुक्यातील कमलेश्वर हायस्कूलमधील १९ मुले शनिवारी शाळेत देण्यात येणारे दुपारचे भोजन जेवल्यानंतर आजारी पडली.
१९ मुलांपैकी एका मुलीला तुएम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सो़डून देण्यात आले. दुपारचे जेवण घेतल्यानंतर या मुलीला उलटया सुरु झाल्या तर अन्य मुलांना अस्वस्थ वाटू लागले. या मुलीच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसून, तिला फक्त डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
सर्व मुले पाचवी ते सातवीच्या वर्गातील आहे. मुलांच्या जेवणामध्ये कोळी सापडल्याची चर्चा होती मात्र अधिका-यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. ब्रम्हानंदचार्य ही स्वयंसेवी संस्था या शाळेला मध्यान्ह भोजन पुरवते. आठडयाभरातील ही दुसरी घटना आहे. आठवडयाच्या सुरुवातील सेंट जोसेफ हायस्कूलमधील २२ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.