महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य अनेक चांगल्या व वैशिष्टयपूर्ण क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, पर्यटन, सहकारी साखर कारखानदारी क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र पुढे आहे.
![chori](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/07/chori-250x300.jpg)
महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य अनेक चांगल्या व वैशिष्टयपूर्ण क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, पर्यटन, सहकारी साखर कारखानदारी क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र पुढे आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे कौतुक व अनुकरण करतात ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. एकीकडे राज्यात असा कौतुकास्पद विकास सुरू असताना चो-या, दरोडे व लुटमार यांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. गेल्या काही वर्षात मुंबई व राज्याच्या अन्य भागातील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हयांना आळा घालण्यात कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला फारसे यश आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड (एनसीआर) अहवालातून हे वास्तव पुढे आले आहे. या अहवालानुसार, इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १४ हजार ४४५ कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली आहे. तसेच देशातील इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत सर्वाधिक आठ हजार ३४४ कोटी रुपयांची मालमत्तेची लूट झाली आहे. विशेष म्हणजे देशातील गुन्हयांमध्ये वाढ झाली असून मालमत्ता चोरीच्या गुन्हयांत २०११च्या तुलनेत २०१२मध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील बहुसंख्य भागात सर्वात जास्त चोरी ही मोटारगाडयांची झाली आहे. २०१२मध्ये देशातून ९७२ कोटी रुपयांच्या गाडयांची चोरी झाली आहे. त्यातील फक्त ३४७ कोटी रुपयांच्या गाडया परत मिळवण्यात यश आले आहे. या मोटारगाडयांच्या चो-यांच्या बाबतीत उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. २०१२मध्ये उत्तर प्रदेशातून २१ हजार ६०० वाहने चोरीला गेली असून त्या खालोखाल महाराष्ट्रात १७ हजार ८५७ गाडयांची चोरी झाली. त्यानंतर १४ हजार ४४६ गाडयांची चोरी होणा-या दिल्लीचा क्रमांक लागतो. गाडया चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण देशातील इतर वस्तूंच्या आणि चैनीच्या वस्तूंच्या महागाईच्या तुलनेत गाडयांच्या किमतीत फार वाढ झाली नाही. गाडय़ांची विविधता, गाडया उत्पादक कंपन्यांची स्पर्धा, सामान्य माणसाच्या आवाक्यात आलेल्या वाहनांच्या किमती, बँकांची गाडी खरेदीसाठी सहज मिळणारी कर्जे यामुळे गाडयांची संख्या सर्वच राज्यात खूप वाढली. त्याचप्रमाणे गाडया चोरणा-या टोळयांची संख्याही वाढली. गाडया सहज चोरता येतात व काही तासांतच त्या कित्येक किलोमीटर अंतरावर नेता येतात, एवढेच नव्हे तर त्या परराज्यातही नेता येतात. काही तासांच्या अवधीत या गाडयांचे रंगरूप बदलता येते. तसेच या गाडयांचे सुटे भाग काढून ते विकता येतात. गाडी चोरीची पोलिसांकडे तक्रार केली तरी त्याचा प्रत्येक प्रकरणात उपयोग होतोच, असे नाही. गाडयांच्या चो-या शोधून काढणे, ही एक वेळखाऊ आणि जिकिरीची प्रक्रिया असते. त्यामुळे चोरीस गेलेल्या गाडयांचा तपास लागण्याची टक्केवारी फार कमी आहे. याचाच फायदा गाडया चोरणा-या टोळया घेतात. देशात चो-या, लुटमार आणि दरोडे हे गुन्हेही वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रातही हे गुन्हे चिंताजनकरीत्या वाढत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हा व महाराष्ट्रातील अनेक विभागात दरोडे, घरफोडया आणि चो-यांचे प्रमाण फार वाढले असून या वाढत्या गुन्हयांना आळा घालण्यात फारसे यश आलेले नाही. मुंबईत गेल्या तीन वर्षात बँका, बँकांची रोकड घेऊन जाणा-या गाडया, जवाहि-यांच्या पेढया, त्यांचे किमती जवाहीर व सोने यांची वाहतूक करणारी वाहने, व्यक्तिगत रक्कम वा दागदागिने घेऊन जाणारी खासगी वाहने यांच्यावर भर दिवसा दरोडे पडत आहेत. कोटयवधी रुपयांची रोकड लुटली जाते. या घटना वाढत्या प्रमाणात असून या गुन्हयांचा तपास लावण्याचे प्रमाण फार कमी आहे. जवाहि-यांच्या पेढयांवर भरदिवसा तर दरोडे पडतच आहेत. पण, रात्रीही पेढया फोडून लूट होत आहे. जवाहि-यांवरील या हल्ल्यांमुळे जवाहिरे, सराफ हैराण झाले असून त्यांनी काही वेळा पोलिस ठाण्यांवर मोच्रेही काढले आहेत. बँकांवरही दरोडे पडले असून या गुन्हयांपैकी फारच थोडया गुन्हयांचा शोध लागून गुन्हेगार पकडले गेले आहेत. या दरोडयांसंबंधात सुमारे ६० वर्षापूर्वी त्या वेळच्या लॉइड्स बँकेवर पडलेल्या दरोडयाचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. १९५२मध्ये फोर्टमध्ये या बँकेची १३ लाखांची रोकड घेऊन जाणा-या व्हॅनवर भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला व ही रोकड पळवण्यात आली. ६० वर्षापूर्वी तेरा लाख ही फार मोठी रक्कम होती व या दरोडयाने देशात खळबळ उडाली होती. या दरोडयाचा तपास स्कॉटलंड यार्डची ख्याती असलेल्या त्या वेळच्या मुंबई पोलिसांनी काही दिवसांत केला व या दरोडयाचा सूत्रधार अनोखेलाल याला त्याच्या लग्नाच्या मंडपातच नाटयपूर्णरीत्या अटक केली होती. पण, आज दरोडे व लुटमार ही नित्याची बाब झाली आहे. दरोडयाच्या बातमीने लोकांना आणि पोलिसांनाही काही वाटेनासे झाले आहे. वास्तविक दरोडा ही गंभीर बाब आहे. या गुन्हयांचा कसून तपास झाला पाहिजे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. या गुन्हयांचा तपास लागण्याचे प्रमाण कमी असल्याने गुन्हेगारांना पोलिस व कायद्याची दहशत उरलेली नाही व ते मोकाट सुटले आहेत. मुंबई व उपनगरात परप्रांतातून गुन्हेगार टोळ्या येतात व दरोडे घालून वा घरफोडया करून लगेच आपल्या राज्यात पळून जातात. मुंबई शहरात व उपनगरातच नव्हे तर राज्याच्या ग्रामीण भागातही दरोडयांचे सत्र सुरू आहे. अनेक जिल्हयांत घरांवर व पेढयांवर सशस्त्र दरोडे पडत असून या दरोडयांचा तपास लागण्याचे प्रमाण कमी आहे. काही दरोडयात दरोडेखोरांनी घरातील माणसांच्या हत्याही केल्या आहेत. दोन वर्षापूर्वी दिवेआगर गणपती मंदिरावर सशस्त्र दरोडा पडला. त्यात मंदिरातील गणेशाची सोन्याची मूर्ती पळवण्यात आली. राज्यात घरफोडया होण्याचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. देशभरात एकूण ६० हजार ५९८ घरफोडया झाल्या. त्यापैकी महाराष्ट्रात १० हजार ५०० घरफोडया झाल्या आहेत. घरफोडयात महाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. तसेच रेल्वे गाडया आणि रेल्वेच्या परिसरात घडलेल्या चो-यांमध्येही राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईमध्ये सोनसाखळी चोरांचाही सुळसुळाट झाला असून हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. सोनसाखळी चोर दुचाकीवरून येतात व साखळी खेचून पसार होतात. अनेक लुटारू ज्येष्ठ व्यक्तींना रस्त्यात गाठून, ‘आम्ही पोलिस आहोत. पुढे रस्त्यात खून झाला आहे. तुमचे दागिने काढून आमच्याकडे सुरक्षित ठेवा.’ अशा भूलथापा देऊन लोकांना लुबाडतात. सोनसाखळ्या व दागिने चोरण्याचे सत्र अव्याहत सुरू आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयांत जे चो-या व दरोडयांचे गुन्हे होत आहेत त्यातील बहुसंख्य गुन्हयांत परप्रांतीय गुन्हेगारांचा हात असतो. अर्थात गुन्हे कोण करतो, हा प्रश्न नाही, त्यांचा तपास लागून गुन्हेगारांना शिक्षा होणे जरूरीचे आहे. या दृष्टीने तपास यंत्रणा अधिक सक्षम होणे जरूरीचे आहे.
[EPSB]
कोळीवाड्यांचा विकास अधांतरी
मुंबई शहर आणि उपनगरात ३८ कोळीवाडे असून ११९ गावठाणे आहेत. मुंबईचे हे कोळीवाडे मुंबईच्या पुरातन वैभवाचे व संस्कृतीचे साक्षीदारही होते. परंतु गेल्या ४० वर्षात या कोळीवाड्यांवर व गावठाणांवर अतिक्रमणांची मालिकाच सुरू आहे. प्रथम वर्सोवाच्या मनोहारी, शांत व हवेशीर किना-यावर मुंबईच्या बांधकाम व्यावसायिकांची नजर गेली व ही किनारपट्टी त्यांनी ४० वर्षापूर्वीच घशात घातली. तेथे आता उच्चभ्रूंच्या इमारती उभ्या […]
[/EPSB]